Posts

Showing posts with the label कीर्तन

गाडगेबाबांचे आमच्या गावातील कीर्तन

Image
◾गाडगेबाबांचे आमच्या गावातील कीर्तन◾          खूप वर्षांपूर्वीचा तो दिवस…माझे आजोबा रामराव माधवराव उबाळे सांगायचे, तेव्हा त्यांचे वय अवघे सोळा वर्षे होते. पाच वर्षांपूर्वी वयाच्या शंभरव्या वर्षी त्यांचे निधन झाले. चऱ्हाटा ता. बीड गाव तसं लहानसं, साधंसुधं. सर्व जाती धर्माचे लोक गावात राहायचे. कच्च्या गल्ल्या, विहिरीचं पाणी, लाईट नाही, संध्याकाळ झाली की टेंभ्यांचा उजेड. आजोबांच्या आठवणीतला तो प्रसंग मात्र आजही जिवंत होता. वयाच्या एकशेएक वर्षांपर्यंत त्यांनी तो तितक्याच जिवंतपणे सांगितला. त्या दिवशी सकाळी सकाळी गावाच्या वेशीवरून एक विचित्र माणूस चालत आला. पांढरीशुभ्र दाढी, उंच, रांगडा देह; पण अंगावर फाटक्या चिंध्या. डोक्यावर कापड गुंडाळलेलं आणि त्यावर मडक. लोकांनी पहिल्यांदा पाहिलं आणि मनात आलं हा कुठला फकीर ? कुठून आला असेल? तो माणूस थेट गल्लीमध्ये गेला. खेळत असलेल्या बारक्या पोरांना हाक मारली.“अरे पोरांनो, या रे… काम आहे.” पोरं कुतूहलानं गोळा झाली. त्यानं कुठलीही कथा सांगितली नाही, उपदेश केला नाही. हातात खराटा घेतला आणि म्हणाला, “चला, गाव झाडून काढूया...