Posts

Showing posts with the label छत्रपती शिवाजी महाराज

सेवेचेठायी तत्पर हिरोजी इंदुळकर…!"

Image
 ◆●अभियंता दिन विशेष●◆ "सेवेचेठायी तत्पर हिरोजी इंदुळकर…!"      दि.१५ सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. आज २१ वे शतक असून त्याला विज्ञान तंत्रज्ञानाचे युग म्हणतो.  आज ठीक ठिकाणी विविध अभियांत्रिकी महाविद्यालये, आयआयटी, तंत्रज्ञान विद्यापीठे उपलब्ध आहेत. हजारो अभियान सुद्धा उपलब्ध आहेत. शिवरायांच्या काळात अशा पद्धतीच्या शिक्षण किंवा इंजिनिअरिंगची कुठलीही व्यवस्था नव्हती. स्थापत्य कलेची आजच्याप्रमाणे आधुनिक व्यवस्था नव्हती. त्या काळामध्ये बांधकाम विभाग संभाळणारे बेलदार किंवा त्या क्षेत्रातील तज्ञ असायचे. शिवरायांना रायगड ही राजधानी चांगली घडवायची होती. रायगडावर पूर्वी एक अर्धवट अवस्थेतील किल्ला होता. रायगडाचा डोंगर नुसता डोंगर नव्हता. तो स्वराज्याची राजधानी होणार होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात एकच विचार होता-“हा गड असा उभा राहिला पाहिजे की स्वराज्याचे वैभव आणि सामर्थ्य शत्रूलाही थरथरवेल.” हा स्वप्नसाकार करण्याची जबाबदारी महाराजांनी एका साध्या पण विलक्षण कर्तृत्ववान माणसावर सोपवली-हिरोजी इंदुळकर. हिरोजी हे  केवळ एक बांधकाम प्र...