संत तुकाराम महाराजांचे दोहे दोहा क्रमांक-२
●◆तुकोबांचे शब्दधन◆● संत तुकाराम महाराजांचे दोहे क्रमांक-२ "रामराम कहे रे मन। औरसुं नहीं काज । बहुत उतारे पार। आघे राख तुकाकी लाज ॥" या दोह्यात संत तुकाराम महाराज आपल्याच मनाला एक प्रेमळ पण ठाम सल्ला देतायत. ते म्हणतात, "हे मना, तू फक्त रामाचं नामस्मरण करत जा, इतर गोष्टीत तुला काही घेणंदेणं नाही." म्हणजे काय, तर या जगात अनेक गोष्टी आकर्षक वाटतात – पैसा, माया, मान-सन्मान, हौस, नवलाई, परंतु या सगळ्या गोष्टी क्षणभंगुर आहेत. या गोष्टी काही केल्या आपल्याला परमेश्वराच्या वाटेवर नेणार नाहीत. त्या फक्त मनाला गुंतवतात, आणि गोंधळ घालतात. तसेच अध्यात्मिक क्षेत्रात अनेक मार्ग आहेत. यामध्ये योग, यज्ञ, कर्मकांड, तंत्रमंत्र, बळी नवस तसेच इतर अनेक कठीण मार्ग आहेत. संत तुकाराम महाराज सांगतात की, "हे मना, तू इतर साधनांमध्ये, दांभिकपणात, आडमुठेपणात, आंगठीधारी बाबांच्या भूलथापांमध्ये नको गुंतूस. फक्त ‘रामराम’ म्हणायचं, तोच खरा साधनाचा रस्ता आहे. आणि तो सगळ्यात सोपा आहे." या दोह्यामध्ये ‘रामराम’ हा शब्द केवळ देवाचं नाव म्हणून न...