Posts

Showing posts with the label पंढरपूर

गजानन महाराज संस्थान – नियोजन, शिस्त आणि स्वच्छतेचा एक आदर्श परिपाठ

Image
●◆गजानन महाराज संस्थान – नियोजन, शिस्त आणि स्वच्छतेचा एक आदर्श परिपाठ◆● ◆श्रीकृष्ण महाराज उबाळे ◆मो.9405344642        पंढरपूर, तीर्थक्षेत्राचं हृदय. इथे दरवर्षी लाखो भाविकांची वारी भरते. वारी ही केवळ भक्ती नाही, ती एक अध्यात्मिक यात्रा आहे, ती संयम, सहनशीलता आणि समर्पण यांचा प्रवास आहे. या सर्व भाविकांसाठी सेवा करणारी अनेक संस्थानं आहेत, परंतु त्यामध्ये विशेष स्थान मिळवले आहे ते संत गजानन महाराज संस्थान ने. गेली अनेक वर्षं आमचा अनुभव हाच सांगतो की या संस्थानमध्ये शिस्त, नियोजन आणि स्वच्छतेचा जो आदर्श पाळला जातो, तो खरंच 'सॅल्यूट' करण्यासारखा आहे. ◆प्रवेशाच्याच क्षणी जाणवतो 'शिस्तीचा' श्वास:- गजानन महाराज मठामध्ये पाय टाकताच जणू एखाद्या जागरूक व्यवस्थापन यंत्रणेचा अनुभव येतो. दरवर्षी आम्ही पंढरपूर वारीदरम्यान मठामध्ये जातो. पहिल्याच टप्प्यावर सुरक्षारक्षक तपासणी करून आत सोडतात. गर्दी असूनही कुठेही गोंधळ नाही. कारण प्रत्येक दहा पावलंवर एक स्वयंसेवक हातात लाकडी काठी घेऊन आपल्या सेवेत उभा असतो. रस्ता दाखवणं, योग्य मार्गाला वळवणं, अनुशासन पाळायला सांगणं – हे स...

पंढरीची आषाढी वारी २०२५- एक आत्मानुभूती

Image
◆पंढरीची आषाढी वारी – एक आत्मानुभूती◆ ◆श्रीकृष्ण महाराज उबाळे ◆मो.9405344642           आषाढी एकादशी... भक्तांच्या जीवनातील सर्वोच्च पर्व. आमच्यासाठी ती केवळ एक धार्मिक घटना नव्हती, तर आत्म्याच्या पंढरीकडे झालेली यात्रा होती. शनिवार रात्री दोन वाजता झोप लागली आणि आश्चर्य म्हणजे रविवारी पहाटे पाचलाच जाग आली. एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. मी वारकरी सेवा केंद्रात जाऊन फ्रेश झालो, थंड पाण्याच्या टँकरखाली अंघोळ केली. तुकाराम महाराज घाडगे यांची दिंडी होती तिथेच आमची गाडी लावली. सकाळच्या शांततेत चहा, भाजलेल्या शेंगा आणि थोडीशी साबुदाणा खिचडी खाल्ल्यावर वाखरीहून पंढरीकडे चालण्याचा निर्धार केला. मार्गक्रमण सुरू झालं… ओठांवर अभंग, हाती टाळ, मनात विठ्ठल. जे अभंग पाठ नव्हते, ते मोबाईलमधून पाहून म्हणत होतो. "विठ्ठल" नाव जिथे जिथे आले, तो प्रत्येक अभंग आम्ही तोंडून घेतला. वाटेतील प्रत्येक पायरी ही जणू विठ्ठलाकडे नेणारी होती. प्रत्येक वळणावर विविध दिंड्या, ढोल, मृदंग, झांज, टाळकरी, विणेकरी, बुवा, माऊल्या, लहान थोर नाचत, गात विठ्ठलनामात रंगलेले दिसत होते. पोलिस, होमगार...

संत नामदेव महाराज अभंग

Image
भेटिलागीं माझा फुटतसे प्राण । काया वाचा मनें जीवेंभावें ॥१॥ जया देखे तया पुसें हेंचि मात । कैं मज अनंत बोलावील ॥२॥ संतसमागमें दसरा दिवाळी । ठेवूनि निढळीं बाहे सदा ॥३॥ सखे पंढरीचे येती वारकरी । आर्त निरंतरीं त्यांचे पायीं ॥४॥ नामा म्हणे ऐसें करी दंडवत । आमुतें पुनीत करी बापा ॥५॥ भगवंताची भेट घडावी म्हणून माझा जीव तळमळतो आहे. शरीर, वाणी, मन, प्राण आणि भावनांनाही भगवंताच्या भेटीची आस लागली आहे. प्रत्येक अंगामधून, विचारांमधून, भावनांमधून एकच आर्त ध्वनी उमटतो — "मला माझा पांडुरंग भेटावा...!'' ही उत्कंठा इतकी तीव्र आहे की, भक्ताचं अस्तित्वच केवळ भगवंताच्या भेटीसाठी झुरतं आहे. जे कोणी भेटेल, त्याला मी हेच विचारतो- "अनंत (भगवंत) मला कधी भेटणार? तो मला कधी बोलावणार?" संत नामदेव महाराजांचा जीवच इतका अनावर झाला आहे की, प्रत्येक माणसाकडे त्यांना एकच प्रश्न पडतो-"माझ्या पांडुरंगाची भेट कधी होईल ?" ही भावना भक्ताच्या अंतर्मनातील अखंड, अधीर प्रश्न आहे. संतांचा संग म्हणजे माझ्यासाठी दसरा आणि दिवाळी..! भक्त असे म्हणतो की, सणवार नसले तरी संतांचा संग मला सदैव ...