Posts

Showing posts with the label ग्रामीण साहित्यिक

आठवणीतले प्रा.भास्कर चंदनशिव

Image
●◆आठवणीतले प्रा. भास्कर चंदनशिव◆● ◆श्रीकृष्ण उबाळे, बीड               २००१ साली मी बीडमधील बलभीम महाविद्यालयाच्या दारात पाऊल टाकलं. अकरावीचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी म्हणून सुरुवात झाली आणि पुढे बारावी पार करून पदवीच्या प्रवासालाही मी तिथेच सुरुवात केली. त्या काळात बॉटनी, झूलॉजी, कम्प्युटर सायन्स हे विषय हाताळताना इंग्रजी आणि मराठी हे अनिवार्य विषय माझ्यासोबत असायचे. पण खरी गोडी, खरं आकर्षण, खरं वेगळेपण मराठी विभागामुळेच निर्माण झालं. मराठी विभागाचे प्रमुख होते प्रा.भास्कर चंदनशिव सर. साधेपणाने राहणारे, नेहमी नेहरू शर्टात दिसणारे, गंभीर आवाजात बोलणारे आणि त्यातही अनोखी ताकद असणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या पहिल्याच व्याख्यानापासून मला जाणवलं की हे केवळ एक शिक्षक नाहीत, तर लेखक, साहित्यिक आणि विचारवंत आहेत. त्यांचे बोलणे म्हणजे एखाद्या कथेला ऐकण्यासारखे, एखाद्या पुस्तकाच्या पानात शिरल्यासारखे. लहानपणापासूनच आम्ही ‘लाल चिखल’ ही त्यांची कथा शाळेतून कित्येक वेळा वाचली होती. आणि आता तोच लेखक आपल्या समोर व्याख्यान देतो आहे, आपल्यालाच श...