Posts

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलेली हनुमान स्तुती

Image
◾जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलेली हनुमान स्तुती ◾               हनुमान हे रामायणातील एक प्रमुख नाव असून ते रामाचे महान भक्त मानले जातात. त्यांच्या जन्मबाबत अनेक मतांतरे आहेत. महाराष्ट्रात त्यांचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाल्याचे मानले जाते. त्या दिवशी हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यांचा जन्म अंजनी नावाच्या वानरीच्या पोटी अंजनेरी जिल्हा नाशिक येथे झाल्याचे मानतात. त्यांच्या वडिलांचे नाव केसरी होते.  हनुमान खूप ताकदवान महाबली होते. त्यांना भूक लागली, फळ समजून सूर्याला खायला निघाले. इंद्राने वज्र फेकून मारले ते हनुवटीला लागले. त्यावरून त्यांचे नाव हनुमान पडले. राम वनवासात असताना त्यांची व हनुमंताची भेट झाली. रावणाने पळवून नेलेल्या सीतामातेचा शोध त्यांनी लावला, रावणची लंका जाळली. लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर द्रोणगिरी पर्वतच उचलून आणला. सात चिरंजीवांपैकी एक चिरंजीव म्हणून हनुमंतरायाचा उल्लेख केला जातो. त्यांना मारुती, हनुमान, पवनसुत, अंजनेय, बजरंगबली, वायुपुत्र,केसरीनंदन असे विविध नाव आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महार...

गाडगेबाबा थोर संत

Image
◾संत गाडगेबाबांविषयी गैरसमज पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर◾             महाराष्ट्राच्या संतपरंपरेत संत गाडगे महाराज यांचं स्थान अत्यंत उंच आहे. अशा थोर संतपुरुषांना “नास्तिक” ठरवण्याचा प्रयत्न माधव घुले नावाच्या तथाकथित बुवाकडून जाणीवपूर्व होत असेल, तर तो केवळ अज्ञानाचा नाही तर वारकरी परंपरेचा अपमान आहे. गाडगेबाबा हे नास्तिक नव्हते ते अंधश्रद्धाविरोधी होते. त्यांनी देव नाकारला नाही, पण देवाच्या नावावर चालणाऱ्या खोट्या आडंबराला विरोध केला. त्यांच्या कीर्तनाची सुरुवात “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या नामस्मरणाने व्हायची आणि संत तुकाराम महाराजांचे अभंग तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्यांचा आधार घेतल्याशिवाय ते कधी बोलले नाहीत. मग अशा संताला नास्तिक म्हणणं हा कोणता अभ्यास, असा सवाल प्रत्येक वारकऱ्याच्या मनात निर्माण होतो. वारकरी संप्रदायाचा गाभा म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आणि हे तिन्ही गुण गाडगेबाबांच्या जीवनात ओसंडून वाहत होते. म्हणूनच अनेक वारकरी त्यांना तुकोबांचा अवतार मानतात. त्यांनी पंढरपूर, आळंदी, देहू येथे वारकऱ्यांसाठी धर्मशाळा, आश्र...

बलिदानाचा अर्थ

Image
◆बलिदानाचा अर्थ◆ रोज नव्या भोंदू बुवाचा चमत्कार इथे घडतोय साऱ्या व्यवस्थेचा मेंदू यामुळेच तर सडतोय कधी येईल विवेकाला जाग ? हा प्रश्न मनाला छळतोय डॉक्टर तुमच्या बलिदानाचा अर्थ कुणाला कळतोय ? ज्यांनी धर्म शिकवायचा त्यांची आज शरम वाटते ज्यांच्यामुळे शांती यावी त्यांची मनात भीती दाटते त्यागाचा मुकुटमणी व्हावा तो नको तिथे लोळतोय डॉक्टर तुमच्या बलिदानाचा अर्थ कुणाला कळतोय ? सत्य असत्य पाहण्याची कुठे भक्तांना शुद्ध असते ? आमच्याच बांधवांशी आमचे खुले युद्ध असते सारा देश अभक्तांनी इथून तिथून जळतोय डॉक्टर तुमच्या बलिदानाचा अर्थ कुणाला कळतोय ? तुकारामांच्या भाषेत बुडणारे डोळ्यांनी पाहवत नाही उगाच शांत बसावे हे मनाला राहवत नाही तुमच्या मार्गाने जाणाऱ्यांना इथला अधर्म गिळतोय डॉक्टर तुमच्या बलिदानाचा अर्थ कुणाला कळतोय ? लोकांना विचाराने येणार नाही निदान दुष्कृत्यांने जाग येईल आपण किती भाबडे आहोत याचाही कधी राग येईल नाहीतर कुत्रं पीठ खातंय आंधळा आपला दळतोय डॉक्टर तुमच्या बलिदानाचा अर्थ कुणाला कळतोय ? ◆श्रीकृष्ण उबाळे,बीड ◆मो.9405344642 #बलिदानाचा_अर्थ #नरेंद्रदाभोळकर #अंधश्रद्धा_निर्मूलन ...

एक गॅसची टाकी आणि चार तासांचा संघर्ष

Image
◾एक गॅसची टाकी आणि चार तासांचा संघर्ष◾           बुधवारी आमच्या घरचा गॅस संपला आणि घरात स्वयंपाक थांबण्याची वेळ आली. आजपर्यंत आम्ही गॅस एजन्सीच्या होम डिलिव्हरी करणाऱ्या रिक्षावाल्याला फोन करून गॅस मागवत होतो. दोन तासात गॅस घरी येत असे. पण यावेळी फोन केला तर त्याने सांगितले की आता होम डिलिव्हरी बंद केली आहे, तुम्ही बुकिंग करून दोन दिवसांनी एजन्सीवरून गॅस घ्या. त्याप्रमाणे मी लगेच आयव्हीआरवर फोन करून गॅस बुकिंग केली. बुकिंग नंबरही मिळाला, पण त्याचा मेसेज काही आला नाही. शुक्रवारी दुपारी तीन वाजता मी गॅस एजन्सीवर गेलो. तिथे गेल्यावर त्यांनी ओटीपी दाखवा असे सांगितले. मी आयव्हीआरवर मिळालेला बुकिंग नंबर दाखवला, पण त्यांनी सरळ सांगितले की मेसेज असेल तरच गॅस मिळेल. माझी समस्या समजून घेण्याऐवजी त्यांनी एक प्रकारे मला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. शेवटी एका व्यक्तीला बोलावून माझी माहिती तपासायला सांगितले. त्या व्यक्तीने मोबाईल ऍपवर माझे केवायसी तपासले. सर्व काही व्यवस्थित होते. मग त्याने माझ्याच मोबाईलवरून पुन्हा बुकिंग केली. त्यानंतर जो मेसेज आला तो पाहून ...

संत तुकाराम महाराज जन्म विशेष

Image
◾अभंग तुकाराम-अखंड तुकाराम ◾              वसंत पंचमीच्या पवित्र दिवशी, तारखेनुसार २ फेब्रुवारी १६०८ रोजी महाराष्ट्राच्या भूमीत एका विलक्षण आत्म्याचा जन्म झाला, तो म्हणजे संत तुकाराम महाराज. त्यांच्या जन्मतारखेबाबत मतभेद असले तरी त्यांच्या विचारांबाबत, त्यांच्या संतत्वाबाबत आणि त्यांच्या समाजपरिवर्तनाबाबत कुठलाही मतभेद नाही, कारण तुकाराम महाराज हे केवळ एका काळापुरते मर्यादित न राहता सर्व काळासाठी मार्गदर्शक ठरलेले महापुरुष आहेत. बोल्होबा व कणकई यांच्या पोटी जन्मलेले तुकाराम महाराज लहान वयातच आयुष्याच्या कठोरतेला सामोरे गेले. वडिलांचा मृत्यू, आईचा मृत्यू, मोठ्या भावाचे घरातून निघून जाणे, भावाच्या पत्नीचा मृत्यू आणि स्वतःच्या मुलाचा व पहिल्या पत्नीचा मृत्यू अशा भीषण दुःखांचा मारा त्यांच्या आयुष्यावर झाला, परंतु या दुःखांनी त्यांना मोडले नाही, उलट त्यांचे मन अधिक अंतर्मुख, अधिक संवेदनशील आणि अधिक भक्तीमय बनले. लहान वयातच त्यांच्या खांद्यावर संसाराचा मोठा भार पडला, व्यापाराची जबाबदारी, कर्जाचे ओझे आणि कुटुंबाची काळजी या सगळ्यांत अडकून असतानाही त...

मन जिंकलं तर जग जिंकता येत

Image
         ❤️अनुभव आले अंगा❤️ ◾मन जिंकलं तर जग जिंकता येत◾          कोरोनाचं लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल झालं होतं. अनेक महिने घरात बंदिस्त असलेलं मन मोकळ्या श्वासासाठी आसुसलेलं होतं. शरीर बाहेर पडायला तयार होतं. अशा वेळी बीडमधील आमच्या देवराई ग्रुपमध्ये एक निर्णय झाला- 'यावेळी वासोटा किल्ला सर करायचा...!' वासोटा… सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्याच्या घनदाट जंगलात वसलेला अती दुर्गम वनदुर्ग. केवळ ट्रेकिंग नव्हे, तर इतिहासाशी थेट संवाद साधणारा अनुभव. निघायच्या आदल्या दिवशीच आम्ही मुक्कामी पोहोचलो. पहाटे लवकर उठून तयारी केली आणि शिवाजी सागर जलाशयातून बोटीत बसलो. कोयना धरणाच्या अथांग पाण्यावरून जाताना सभोवतालचं वातावरण विलक्षण गंभीर वाटत होतं. डोंगररांगा, पाण्यावर पडलेली सकाळची कोवळी ऊन आणि शांततेत मिसळलेला इतिहास.....मन नकळत शिवकाळात हरवून गेलं. वनविभागाच्या चेक पॉईंटवर पोहोचलो. प्लास्टिक बाटल्या, सामान यांची काटेकोर तपासणी झाली. कारण हे जंगल म्हणजे निसर्गाचं पवित्र मंदिर आहे. तिथून पुढे सुरू झाला खरा कसोटीचा प्रवास. जंगलातून वासोट्या...

गरज सरोआणि वैद्य मरो

Image
◾गरज सरो आणि वैद्य मरो ◾            एखाद्या कादंबरीत असावी अशी घटना. चार वर्षांपूर्वी बीड शहरात घडलेली. माणसाच्या स्वार्थी वृत्तीचं, उपकार विसरण्याचं आणि गरज संपली की माणसं कशी बदलतात याचं जिवंत उदाहरण. बीड येथील एका सामाजिक संस्थेने मोठ्या कष्टानं वृद्धाश्रम सुरू केलं होतं. फार मोठ नाही, पण स्वच्छ, माणुसकी जपणारं, प्रेमाने चालणारं. तेथे येणारे वृद्ध म्हणजे आयुष्याने थकलेले, नात्यांनी फसवलेले, संसाराने झिजवलेले. अशाच एका दुपारी आश्रमाच्या दारात एक वृद्ध जोडपं उभं होतं. साधी कपडे, अंगावर थकव्याची झाक, डोळ्यांत भीती आणि आसरा द्यावा ही अपेक्षा यांचा विचित्र संगम. वय साधारण साठच्या आसपास. त्यांना मुलबाळ नव्हते. आयुष्यभर सरकारी सेवेत काम केलेलं. पती मंडळ अधिकारी होते. पण काही कारणाने त्यांची सरकारी सेवेतून बडतर्फी झाली होती. ती अन्यायकारक असल्याचं त्यांना वाटत होतं, म्हणून त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. केस चालू होती. पण केस चालू असताना नोकरी गेली, पगार थांबला, आणि आयुष्याची गाडी रुळावरून घसरली.नोकरी हेच त्यांचं जगण्याचं एकमेव साधन होतं. सुरुवा...