तोफा आणा... रणगाडे आणा..मला मारून टाका...!!
"तोफा आणा... रणगाडे आणा..मला मारून टाका...!!" (होळ, ता. केज जि. बीड येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या धैर्याची कथा) १९६७ च्या वर्षात, भारतात निवडणुकींचे वारे वाहू लागले होते. लोकशाहीच्या रुजवतीचा काळ होता तो. क्रांतिसिंह नाना पाटील, इंग्रजांना हादरवणारा, 'प्रतिसरकार' स्थापणारा, सत्यशोधक विचारांचा पुरस्कर्ता, आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारीवर मैदानात उतरला होता. बीड जिल्हा, विशेषतः होळ गाव ता.केज हे काँग्रेसचा बालेकिल्ला मानले जायचे. तिथे कम्युनिस्टांचा प्रवेश म्हणजे जणू खोलवर गेलेल्या मुळांमध्ये नवा विचार रोवण्याचा प्रयत्न. निवडणूक प्रचारासाठी नाना पाटील होळ येथे पोहोचले. गावाच्या वेशीवर काही लोक आधीच जमलेले. त्यांच्या हातात दगड, अंडी आणि राग होता. “हे काय? नानांवर दगडफेक? अंडीफेक?” कोणी म्हणाले, “कम्युनिस्टांचं काय काम आमच्या गावात?” कोणी ओरडले, “हे काँग्रेसचं गाव आहे...!” हल्ला झाला. गर्दीतून दगड हवेत उडाले, काही अंडी नानांच्या अंगावर येऊन फुटली. पण नाना पाटील एक इंचही मागे हटले नाहीत. नानांन...