मन जिंकलं तर जग जिंकता येत
❤️अनुभव आले अंगा❤️ ◾मन जिंकलं तर जग जिंकता येत◾ कोरोनाचं लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल झालं होतं. अनेक महिने घरात बंदिस्त असलेलं मन मोकळ्या श्वासासाठी आसुसलेलं होतं. शरीर बाहेर पडायला तयार होतं. अशा वेळी बीडमधील आमच्या देवराई ग्रुपमध्ये एक निर्णय झाला- 'यावेळी वासोटा किल्ला सर करायचा...!' वासोटा… सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्याच्या घनदाट जंगलात वसलेला अती दुर्गम वनदुर्ग. केवळ ट्रेकिंग नव्हे, तर इतिहासाशी थेट संवाद साधणारा अनुभव. निघायच्या आदल्या दिवशीच आम्ही मुक्कामी पोहोचलो. पहाटे लवकर उठून तयारी केली आणि शिवाजी सागर जलाशयातून बोटीत बसलो. कोयना धरणाच्या अथांग पाण्यावरून जाताना सभोवतालचं वातावरण विलक्षण गंभीर वाटत होतं. डोंगररांगा, पाण्यावर पडलेली सकाळची कोवळी ऊन आणि शांततेत मिसळलेला इतिहास.....मन नकळत शिवकाळात हरवून गेलं. वनविभागाच्या चेक पॉईंटवर पोहोचलो. प्लास्टिक बाटल्या, सामान यांची काटेकोर तपासणी झाली. कारण हे जंगल म्हणजे निसर्गाचं पवित्र मंदिर आहे. तिथून पुढे सुरू झाला खरा कसोटीचा प्रवास. जंगलातून वासोट्या...