Posts

Showing posts with the label कथा

गरज सरोआणि वैद्य मरो

Image
◾गरज सरो आणि वैद्य मरो ◾            एखाद्या कादंबरीत असावी अशी घटना. चार वर्षांपूर्वी बीड शहरात घडलेली. माणसाच्या स्वार्थी वृत्तीचं, उपकार विसरण्याचं आणि गरज संपली की माणसं कशी बदलतात याचं जिवंत उदाहरण. बीड येथील एका सामाजिक संस्थेने मोठ्या कष्टानं वृद्धाश्रम सुरू केलं होतं. फार मोठ नाही, पण स्वच्छ, माणुसकी जपणारं, प्रेमाने चालणारं. तेथे येणारे वृद्ध म्हणजे आयुष्याने थकलेले, नात्यांनी फसवलेले, संसाराने झिजवलेले. अशाच एका दुपारी आश्रमाच्या दारात एक वृद्ध जोडपं उभं होतं. साधी कपडे, अंगावर थकव्याची झाक, डोळ्यांत भीती आणि आसरा द्यावा ही अपेक्षा यांचा विचित्र संगम. वय साधारण साठच्या आसपास. त्यांना मुलबाळ नव्हते. आयुष्यभर सरकारी सेवेत काम केलेलं. पती मंडळ अधिकारी होते. पण काही कारणाने त्यांची सरकारी सेवेतून बडतर्फी झाली होती. ती अन्यायकारक असल्याचं त्यांना वाटत होतं, म्हणून त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. केस चालू होती. पण केस चालू असताना नोकरी गेली, पगार थांबला, आणि आयुष्याची गाडी रुळावरून घसरली.नोकरी हेच त्यांचं जगण्याचं एकमेव साधन होतं. सुरुवा...

बेलपान

Image
                         बेलपान     मी पाचवी-सहावीत शिकत होतो. घरची परिस्थिती साधीच. आमचं घर श्रीमंत नव्हतं, पण मेहनतीचं होतं. आई-वडील दिवसभर कष्ट करत, आणि त्यांना हातभार लावणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. मी आणि माझ्या दोन बहिणी, आम्ही सगळ्या घरकामात, शेतकामात आणि जनावरांच्या देखभालीत मदत करायचो. सुट्टीचे दिवस असले की गाई-म्हशी, शेळ्या, कोंबड्या सांभाळणं, शेतात पाणी घालणं, तण काढणं… आणि दिवाळीनंतर कापसाचं हंगाम सुरू झाला की, गावात दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात किलोने कापूस येचायला जायचो. त्या कामातून मिळालेले पैसे मी हाक आई-वडिलांच्या हातावर ठेवायचो. त्यावेळी वाटायचं - "आपण लहान असलो तरी घराला थोडा आधार देऊ शकतो."             दरवर्षी श्रावण महिना आला की, माझ्यासाठी एक वेगळाच आनंद यायचा. श्रावणातील प्रत्येक सोमवारी लोक महादेवाच्या दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात जायचे. आमच्या गावात काही मोठी बेलाची झाडं होती. मी सकाळी लवकर उठून ती बेलपानं तोडायचो. ती पानं अगदी टवट...