Posts

Showing posts with the label तुकाराम मुंढे

खरोखर 'तुकाराम' मुंढेंचे निलंबन नव्हे बडतर्फी करायला हवी...!!

Image
खरोखर 'तुकाराम' मुंढेंचे निलंबन नव्हे बडतर्फी करायला हवी...!!               आजही आपल्या समाजात सत्य बोलणारा, नियम पाळणारा आणि सरळ चालणारा माणूस ‘समस्या’ समजला जातो. इतिहासात संत तुकाराम महाराजांना तत्कालीन व्यवस्थेने सहन केले नाही, त्यांच्या अभंगांनी ढोंगीपणाचा मुखवटा फाडला म्हणून त्यांना विरोध झाला. आजचा काळ बदलला… पण ढोंगीपणा, भ्रष्टाचार, पूरकतेची मानसिकता अजिबात बदलली नाही. तुकाराम म्हणजे सत्यनिष्ठा. सत्यासाठी जगणे, सत्यासाठी उभे राहणे, सत्यासाठी झगडणे हीच त्यांची शिकवण. ते म्हणालेच आहेत : “सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे…” सत्यावर असंख्य अभंग....कारण त्यांना माहिती होते की मनुष्याला सर्वात कठीण गोष्ट म्हणजे सत्य जगणे.          आज या सत्यनिष्ठ विचारांचा वारसा पुढे नेणारा एक अधिकारी—तुकाराम मुंढे यांच्यावर कारवाईचे राजकारण सुरू आहे. कारण? ते नियम पाळतात. भ्रष्टाचार सहन करत नाहीत. सिस्टिममधील सडलेले चेहरे उघडे करतात.बोगस अपंग योजनेचा गैरवापर करणार्‍यांवर कारवाई करतात. आणि म्हणून त्यांना सतत बदली, निलंबन, दबाव याला स...