Posts

Showing posts with the label संत नामदेव महाराज

संत नामदेव महाराज अभंग

Image
●◆तुकोबांचे शब्दधन ◆● "भजन चालिले उपराटो ।  कोण जाणे खरे खोटे ।।   सजीवासी हाणी लाथा ।  निर्जीवापायी ठेवि माथा ।।   सजीव तुळशी तोडा ।  पूजा निर्जीव दगडा ।।   बेला करी मोडातोडी ।  शिवा लावोली रोकडी ।।   तोंड धरुनि मेंढा मारा ।  म्हणती सोमयाग करा ।।   सिंदूर माखुनिया थोडा ।  त्यासी भजति पोरे रांडा ।। अग्निहोत्राचा सुकाळ ।  कुशपिंपळाचा काळ ।।   मूर्तिकेची पूजा नागा ।  जित्यां नागा घेती अंग ।।   नामा म्हणे अवघे खोटे ।  एक हरिनाम गोमटे ।।" - संत शिरोमणी नामदेव महाराज  संत नामदेव महाराजांची अतिशय तीव्र, परखड आणि जागृती निर्माण करणारी अभंगरचना आहे. यात त्यांनी समाजातील आंधळ्या श्रद्धा, ढोंगी पूजा-पद्धती, रुढीपरंपरा, मूर्तिपूजेचा अंधानुकरण आणि खोट्या धार्मिक आडंबरांवर स्पष्ट आणि निर्भीड टीका केली आहे.  'सध्या जे भजन, पूजाअर्चा चालू आहे ती उलटी, खोटी चालले आहे. कोणाला काय समजतंय, खरं-खोटं ओळखणं कठीण झालंय. काहीजणांना खरंखोटं कळूनही ते उलटं वागत आहेत. खऱ्याचं खर...

संत नामदेव महाराज अभंग

Image
भेटिलागीं माझा फुटतसे प्राण । काया वाचा मनें जीवेंभावें ॥१॥ जया देखे तया पुसें हेंचि मात । कैं मज अनंत बोलावील ॥२॥ संतसमागमें दसरा दिवाळी । ठेवूनि निढळीं बाहे सदा ॥३॥ सखे पंढरीचे येती वारकरी । आर्त निरंतरीं त्यांचे पायीं ॥४॥ नामा म्हणे ऐसें करी दंडवत । आमुतें पुनीत करी बापा ॥५॥ भगवंताची भेट घडावी म्हणून माझा जीव तळमळतो आहे. शरीर, वाणी, मन, प्राण आणि भावनांनाही भगवंताच्या भेटीची आस लागली आहे. प्रत्येक अंगामधून, विचारांमधून, भावनांमधून एकच आर्त ध्वनी उमटतो — "मला माझा पांडुरंग भेटावा...!'' ही उत्कंठा इतकी तीव्र आहे की, भक्ताचं अस्तित्वच केवळ भगवंताच्या भेटीसाठी झुरतं आहे. जे कोणी भेटेल, त्याला मी हेच विचारतो- "अनंत (भगवंत) मला कधी भेटणार? तो मला कधी बोलावणार?" संत नामदेव महाराजांचा जीवच इतका अनावर झाला आहे की, प्रत्येक माणसाकडे त्यांना एकच प्रश्न पडतो-"माझ्या पांडुरंगाची भेट कधी होईल ?" ही भावना भक्ताच्या अंतर्मनातील अखंड, अधीर प्रश्न आहे. संतांचा संग म्हणजे माझ्यासाठी दसरा आणि दिवाळी..! भक्त असे म्हणतो की, सणवार नसले तरी संतांचा संग मला सदैव ...