Posts

Showing posts from December, 2025

साने गुरुजी : माणुसकीचा दिवा पेटवणारा संत शिक्षक

Image
साने गुरुजी : माणुसकीचा दिवा पेटवणारा संत शिक्षक           महाराष्ट्राच्या मातीला जर कुणी माणुसकीचा सुगंध दिला असेल, तर तो साने गुरुजींनी दिला. पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं पूर्ण नाव. २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालगड या लहानशा गावात त्यांचा जन्म झाला. समुद्रकिनाऱ्याजवळचं ते गाव, साधी माणसं आणि कष्टकरी जीवन याच वातावरणात गुरुजी वाढले. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. वडिलांची नोकरी तुटपुंजी, आईचा संसाराचा ओढा मोठा. तरीही त्या घरात प्रेमाची, संस्कारांची आणि सत्याची कमी कधीच नव्हती. आईकडूनच गुरुजींना माणसावर प्रेम करायचं, दुःख पाहून गप्प बसायचं नाही, हे शिकायला मिळालं. बालपणापासूनच गुरुजींचं मन थोडं वेगळं होतं. इतर मुलं खेळात रमलेली असताना हा पोरगा पुस्तकात डोकं खुपसून बसायचा. अंगात साधे कपडे, पायात चप्पल नाही, पण डोळ्यांत मात्र मोठी स्वप्नं होती. शिक्षण घेत घेत ते पुणे, मुंबईपर्यंत पोहोचले. अभ्यासात हुशार असल्यामुळे नंतर शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. पण गुरुजींसाठी शिक्षक म्हणजे फक्त शाळेत तास घ्यायचा धंदा नव्हता. विद्यार्थ्यांच्य...

सगळे बिबटे मारून टाकले पाहिजेत.....!!

Image
सगळे बिबटे मारून टाकले पाहिजेत.....!!                 सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात तसेच प्रत्येक जिल्ह्यात, आपल्या बीडमधील आजूबाजूच्या तालुक्यांत आणि गावोगावी एकच चर्चा चालू आहे की बिबट्यांची दहशत वाढली, बिबट्या गावात शिरला, शेतात दिसतोय, माणसांवर हल्ले होतातायत. हे ऐकल्यावर भीती वाटणं साहजिक आहे, पण थोडं शांतपणे विचार केला तर कळतं की खरंतर दहशत बिबट्यांची नाही, दहशत आपल्या गैरसमजांची आहे. बिबट्या हा काही आज कालच जंगलातून बाहेर पडलेला प्राणी नाही, तो इथेच होता, आपल्या आजोबांच्या काळातही होता, फरक एवढाच आहे की तेव्हा जंगलं, झुडपं, डोंगररांगा होत्या, आज तिथं रस्ते झाले, कारखाने झाले, वसाहती वाढल्या, उसाची शेती सगळीकडं पसरली आणि बिबट्याचा आसरा कमी झाला. जिथं लपायला उस आहे, पाणी आहे, मोकाट कुत्रे आहेत, डुक्कर आहेत, शेळ्या, मेंढ्या आहेत, तिथं बिबट्या येणारच, त्याला गावात यायची हौस नसते, त्याला फक्त पोटाची आणि जगायची गरज असते. लोक म्हणतात बिबट्यांची संख्या फार वाढली, पण खरं सांगायचं तर बिबट्यांपेक्षा माणसांची संख्या आणि आपला निसर्गातला हस...

दत्ता झोडगेची कामगिरी

Image
एशिया मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये दत्ता झोडगेची सोनेरी कामगिरी ४०० मीटर आंतरराष्ट्रीय रिले स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक बीड (प्रतिनिधी) :  चऱ्हाटा (ता. बीड ) या क्रीडामय भूमीचा सुपुत्र दत्ता झोडगे याने चेन्नई येथे दि. ०५ ते ०९  नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या २३व्या ‘एशिया मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिप २०२५’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना ४×१०० मीटर रिलेस्पर्धेत सुवर्णपदक पटकावून अभूतपूर्व कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय यशामुळे चऱ्हाटा गाव, बीड जिल्हा, महाराष्ट्र राज्यासह भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकला आहे. दत्ता झोडगे हा गेल्या अनेक वर्षांपासून धावण्याच्या क्षेत्रात सातत्याने परिश्रम घेणारे, जिद्दी व शिस्तप्रिय खेळाडू म्हणून ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय धावण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदकांची श्रीमंती मिळवली आहे. सदरील स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धा सुरू असून त्यामध्ये भारतासह आशियातील विविध देशांमधून दोन हजारापेक्षा जास्त ॲथलेटिक्स खेळाडूंनी सहभाग नोंदवला. दत्ता झोडगे यांनी यापूर्वीही विविध राष्ट्री...

खरोखर 'तुकाराम' मुंढेंचे निलंबन नव्हे बडतर्फी करायला हवी...!!

Image
खरोखर 'तुकाराम' मुंढेंचे निलंबन नव्हे बडतर्फी करायला हवी...!!               आजही आपल्या समाजात सत्य बोलणारा, नियम पाळणारा आणि सरळ चालणारा माणूस ‘समस्या’ समजला जातो. इतिहासात संत तुकाराम महाराजांना तत्कालीन व्यवस्थेने सहन केले नाही, त्यांच्या अभंगांनी ढोंगीपणाचा मुखवटा फाडला म्हणून त्यांना विरोध झाला. आजचा काळ बदलला… पण ढोंगीपणा, भ्रष्टाचार, पूरकतेची मानसिकता अजिबात बदलली नाही. तुकाराम म्हणजे सत्यनिष्ठा. सत्यासाठी जगणे, सत्यासाठी उभे राहणे, सत्यासाठी झगडणे हीच त्यांची शिकवण. ते म्हणालेच आहेत : “सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे…” सत्यावर असंख्य अभंग....कारण त्यांना माहिती होते की मनुष्याला सर्वात कठीण गोष्ट म्हणजे सत्य जगणे.          आज या सत्यनिष्ठ विचारांचा वारसा पुढे नेणारा एक अधिकारी—तुकाराम मुंढे यांच्यावर कारवाईचे राजकारण सुरू आहे. कारण? ते नियम पाळतात. भ्रष्टाचार सहन करत नाहीत. सिस्टिममधील सडलेले चेहरे उघडे करतात.बोगस अपंग योजनेचा गैरवापर करणार्‍यांवर कारवाई करतात. आणि म्हणून त्यांना सतत बदली, निलंबन, दबाव याला स...

बीडच्या डोंगर पट्ट्यातील निवडुंग वनस्पती धोक्यात

Image
बीडच्या डोंगर पट्ट्यातील निवडुंग वनस्पती धोक्यात च-हाटा परिसरात पांढऱ्या रोगाचा फैलाव; निवडुंग मोठ्या प्रमाणावर नष्ट ◆श्रीकृष्ण उबाळे ◆मो.9405344642 बीड:  बीड जिल्ह्यातील डोंगराळ व कमी पावसाच्या पट्ट्यात नैसर्गिकरीत्या उगवणारी आणि पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत आवश्यक मानली जाणारी  निवडुंग वनस्पती  आज गंभीर संकटातून जात आहे. अलीकडच्या महिन्यांमध्ये  पांढऱ्या किडीचा (mealy bug)  प्रादुर्भाव एवढ्या वेगाने वाढला आहे की च-हाटा गावासह आसपासच्या संपूर्ण डोंगरपट्ट्यात ही वनस्पती  जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर  आली आहे. निवडुंगाच्या खोडावर पांढऱ्या रंगाचा चिकट थर दिसू लागतो आणि काही आठवड्यांतच संपूर्ण झाड व्यापून टाकतो. ही कीड रस शोषून घेत असल्याने झाड पूर्णपणे कमजोर होते, पिवळे पडते आणि अखेरीस पूर्णपणे सुकून जाते. गेल्या काही वर्षांत कधीही न दिसलेला एवढा मोठा प्रादुर्भाव या वर्षी प्रथमच नजरेस पडत असल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. ग्रामीण आणि डोंगराळ भागात निवडुंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो-माती धूप होऊ नये म्हणून  मृदासंरक्षण  करतो, ...