Posts

Showing posts from October, 2025

इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे...!'

Image
◆'इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे...!'◆ ◆ह.भ.प.श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड ◆मो.9405344642           आपल्या महाराष्ट्रामध्ये बळीराजा हा शब्द शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये नेहमी वापरण्यात येतो. शेतकऱ्याला बळीराजा असे म्हंटले जाते. महाराष्ट्र आणि बळीराजा यांचं किती जिव्हाळ्याचं नातं आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. म्हणून बलिप्रतिपदेच्या निमित्त बळीराजा कोण होता ? कसा होता ? या विषयी थोडीशी माहिती घेऊया.  ◆पुराणकथा◆     बळीराजाच्या संदर्भात महाभारत, भागवत आणि पद्मपुराण अशा विविध ठिकाणी कथा आढळते. पण गोष्ट अशी की प्रत्येक पुराणातील कथा वेगवेगळ्या आहेत. सर्वसामान्यपणे जी कथा सांगितली जाते ती अशी 'कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणतात. त्या दिवशी बळी व त्याची पत्नी विंध्यावली यांची पूजा केली जाते. असुर (राक्षस) यांचा राजा बळी हा प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. बळीराजा राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजादक्ष होता, दानशूरपणात खूप पुढे होता. त्याची शक्ती खूप वाढली होती. त्याने देव लोकांचा पराभव केला होता. मग व...

कुत्रे आणि समाज आरसा एकच आहे

Image
◆कुत्रे आणि समाज : आरसा एकच आहे...!◆             आजच्या समाजात ‘कुत्रे’ हा शब्द फक्त प्राण्यापुरता मर्यादित नाही. कुणाला कमी लेखायचं, कुणाचं वागणं दाखवायचं, कुणावर व्यंग करायचं- की झालं लगेच “अरे, तो तर कुत्र्यासारखा भुंकतो...!” असं म्हणतात. पण खरं सांगायचं तर, समाजातल्या अनेक प्रवृत्ती या अगदी कुत्र्यांसारख्याच झाल्या आहेत. कुत्रं भुंकण्यासाठी प्रसिद्ध आहे- कारण असो वा नसो, त्यांना भुंकल्याशिवाय चैन पडत नाही. आजची माणसंही तशीच झाली आहेत. सोशल मीडियावर, राजकारणात, गावपातळीवर... कुणी काही बोललं की लगेच टोळकं भुंकायला लागतं. तथ्य, विवेक, संयम या गोष्टींचं काही घेणंदेणं नाही- फक्त आवाज मोठा हवा एवढंच....! काही कुत्रे पाळीव असतात- मालकाच्या ‘छो’वर चालतात. समाजातही असे बरेच ‘पाळीव’ माणसे आहेत. नेता, संस्थाचालक, किंवा आर्थिक मालक जे म्हणतील तेच करायचं. विचार स्वतःचा नसतो, पण आदेश मिळाला की “तुटून पडायचं ” हाच त्यांचा धर्म. काही कुत्रे मात्र मोकाट असतात. मालक नाही, नियंत्रण नाही-जसं मनात येईल तसं वागतात. शहरात, गावात, गल्लीबोळात, पानटपरीवर सगळीकडे त्या...

एक अस्सल शिक्षक आणि संवेदनशील लेखक – प्रभाकरराव महाजन

Image
एक अस्सल शिक्षक आणि संवेदनशील लेखक – प्रभाकरराव महाजन              प्रभाकरराव महाजन (माजी मुख्याध्यापक, राजस्थानी विद्यालय, बीड)- हे नाव बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात आदराने घेतले जायचे. राजस्थानी विद्यालयाला ओळख निर्माण करून देणारे, अनुशासन, प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभाकरराव महाजन सर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेने केवळ निकालांची उंची गाठली नाही, तर संस्कारांचे झाड रुजवले. आज त्यांचा देह निखळला असला, तरी त्यांनी दिलेलं शिक्षण आणि विचारांची बीजं अनेकांच्या मनामध्ये कायम जिवंत राहतील. मी “चंपावती पत्र” या दैनिकामध्ये ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांवर आधारित ‘अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी’ या नावाने लेखमाला लिहीत होतो. त्या मालिकेतील एक लेख - “आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया”- सरांनी वाचला. त्या लेखाखाली मी दिलेली कथा त्यांना एवढी भावली की त्यांनी मला थेट फोन केला. फोनवरील त्यांचा आवाज अजूनही कानात घुमतो- “अहो, तुमचं नाव श्रीकृष्ण उबाळे का? च-हाटा गावचे का?” असं विचारून ते मनापा...

ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील- राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या राज्यप्रमुखपदी निवड

Image
ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील- राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या राज्यप्रमुखपदी निवड अध्यात्म, संस्कार आणि परिवर्तनाचा प्रवास              अध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारे आणि वारकरी संप्रदायातील नवे विचार रुजवणारे ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या महाराष्ट्र राज्यप्रमुखपदी निवड झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे वारकरी परंपरेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मुळशी तालुक्यातील मोसे खोरे या अतिदुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत त्यांचा जन्म झाला. कोणताही वारसा, पाठबळ किंवा आर्थिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी स्वतःच्या कष्टावर आणि श्रद्धेवर आपले व्यक्तिमत्त्व उभे केले. लहानपणापासूनच संसाराची जबाबदारी अंगावर घेत त्यांनी पाणीपुरीच्या गाडीवर काम, पेपर वाटप, इस्त्री काम, ऑफिस बॉय अशी विविध छोटीमोठी कामे केली. या कष्टांमध्येही त्यांच्या अंतःकरणात भक्ती, भजन आणि कीर्तनाची गोड झुळूक वाहत राहिली. बालवयापासूनच कीर्तन आणि गायनाची आवड असल्याने त्यांनी २०१६ पासून कीर्तन...

ज्ञानऋषींच्या दर्शनाने समृद्ध झालेला दिवस

Image
◆◆ज्ञानऋषींच्या दर्शनाने समृद्ध झालेला दिवस◆◆ (डॉ. आ. ह. साळुंखे सरांच्या भेटीचा अविस्मरणीय अनुभव)          कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात की त्या क्षणांचं स्मरण मनाला पुन्हा पुन्हा उभारी देतं, आत्मा प्रफुल्लित करतो आणि विचारांच्या नव्या वाटा दाखवतो. असा एक क्षण माझ्या आणि नितीन महाराज पिसाळ यांच्या आयुष्यात आला- जेव्हा आम्हाला आजच्या काळातील ज्ञानऋषी, मानवतावादी चिंतक आणि लोकशिक्षक डॉ. आ. ह. साळुंखे सर यांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा आणि संवादाचा योग आला. त्या दिवशी आम्ही कोल्हापूरमध्ये डॉ. जयसिंगराव पवार सरांचा निरोप घेऊन साताऱ्याकडे निघालो होतो. प्रवास जरी लांब होता, तरी मनात उत्साह ओसंडून वाहत होता. कारण आज आपण त्या व्यक्तिमत्त्वाला भेटणार होतो ज्यांनी महाराष्ट्रात विवेक, विज्ञाननिष्ठा, मानवता आणि तुकारामांच्या विचारांची आधुनिक व्याख्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवली आहे. सुमारे सायंकाळी पाचच्या सुमारास आम्ही साताऱ्याच्या बसस्थानकावर पोहोचलो. तिथून रिक्षा करून आम्ही गेंडामाळ येथे त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो. राकेश दादा- म्हणजेच साळुंखे सरांचे सुपुत...

“विष्ठेचे विज्ञान आणि श्रद्धेचा अंधार”

Image
🕊️ “विष्ठेचे विज्ञान आणि श्रद्धेचा अंधार” 🕊️ कधी काळी अहिंसेचे पुजारी म्हणून गौरवले जाणारे काही “मुनी” आज अशा हास्यास्पद विधानांनी स्वतःच्या बुद्धीला झटके देत आहेत की, ऐकणाऱ्याने हसावं की रडावं हेच कळेनासं होतं. अलीकडेच काही तथाकथित “धर्मगुरूंनी” कबुतरांना श्रद्धांजली देण्यासाठी एक भव्य प्रार्थना सभा घेतली आणि तिथे जे विचार मांडले ते अंधश्रद्धेच्या खाईत आपलं समाजजीवन किती खोल गेलं आहे याचं जिवंत उदाहरण ठरले. पहिला “मुनी” म्हणतो-“कबुतराच्या विष्ठेमुळे लोक मरले तर पर्वा नाही; झाडाचं पान अंगावर पडलं म्हणून पानाला दोष देणार का?” वा रे! काय विचारमंथन...! म्हणजे झाडाचं पान आणि कबुतराची विष्ठा यांच्यातला फरकच संपवला! डॉक्टर मूर्ख, पण हा मुनी ज्ञानी. मग माणसाने विज्ञान शिकायचंच कशाला, विष्ठाचं तत्त्वज्ञान पुरेसं आहे....! दुसरा “मुनी” तर याहून एक पाऊल पुढे. तो सांगतो- “कबुतराची विष्ठा औषधी आहे. तिचा धूर घेतला की मेंदू स्वच्छ होतो, ती पाण्यात भिजवून प्यायली की किडनीचे रोग दूर होतात!” असं काही ‘वैद्यकशास्त्र’ भारतात जन्माला आलं असतं, तर WHO ने औषधनिर्मिती बंद करून विष्ठेचा व्यापार स...

नेमबाजीची बक्षिसी

Image
◆●नेमबाजीची बक्षिसी●◆         बालपण म्हणजे निरागस खट्याळपणा. त्या वयात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायची आपली सवय असते. कुणाच्या बागेतून आंबे पाडणं, शेतातल्या झाडांवर चढणं, शाळेतून सुट्टी करून नदीत पोहायला जाणं – हे सगळं जरी त्या काळी फार मोठं वाटायचं, तरी आज आठवलं की चेहऱ्यावर एक वेगळंच हसू येतं. मी सहावी-सातवीत असेन. उन्हाळ्याची दुपार. शाळा सुटली होती आणि आम्हा मुलांच्या डोक्यात फक्त एकच विचार होता – आंब्याला पाड लागलाय, चला मग आंबे खाऊन येऊ. त्या काळी आंब्याचा प्रत्येक पाड आमच्या दृष्टीने खजिनाच होता. मांजरदरा शेतात भरत बाप्पूचं वावर होतं. त्या वावरात उभा असलेला "काळू-बाळू" नावाचा एक अफाट आंबा आम्हा मुलांचा आवडता होता. उंचीने मोठा, फांद्यांनी दाट आणि आंब्यांनी ओथंबलेला. आम्ही लांबूनच त्याच्याकडे बघत राहायचो. डोकं वर केलं की पिकलेले आंबे डोळ्यांना दिसायचे आणि तोंडाला पाणी सुटायचं. पण त्या आंब्याला एक मोठा अडसर होता – तीन-तीन आग्या मोहळं. मोहळाच्या माशांचा सैन्य त्या झाडाभोवती कायम घिरट्या घालायचं. साधा दगड झाडावर आदळला की माशा भुणभुण करत बाहेर पडा...

कमळाकर

Image
                 ◆●कमळाकर●◆             गाव म्हणलं की त्याच्या अंगणात आपोआप काही वैशिष्ट्यपूर्ण माणसं असतात. काही लोकं गावात जन्मलेली असतात, काही कुठून तरी आलेली असतात. पण त्या सगळ्या गर्दीत आपली छाप उमटवणारा माणूस कधी कधी असा असतो, ज्याला समाज "वेडा" समजतो. आमच्या च-हाटा ता.बीड गावात असाच एक माणूस होता – कमळाकर. तो आमच्या गावचा नव्हता. कुठल्या तरी ब्राह्मण कुटुंबातून आलेला. त्याची पत्नी आणि मुलगा बीडला किंवा कुठेतरी शहरात राहत होते. पण कमळाकर मात्र आमच्या गावात येऊन स्थिरावला. लोकं सांगायची की त्याच्या मनावर परिणाम झाला होता. तो थोडा वेडसरसारखा वागायचा, पण गावात कोणालाही त्रास देत नव्हता. कमळाकर मामांची दुनिया वेगळीच होती. नेहमी फेकून दिलेले, मळकट कपडे अंगावर. ते कपडे तो स्वतःच्या हाताने सुई-दोऱ्यानं शिवून घालायचा. डोक्यावर नेहमी गांधी टोपी. त्याच्या गाठोड्यात त्याचं सगळं आयुष्य भरलेलं असायचं—लोखंडाचा पाण्याचा डबा, जेवणासाठी जर्मनची प्लेट, एक परात आणि दोन-चार कपडे. इतकंच त्याचं घर, इतकंच त्याचं आयुष्...