Posts

Showing posts from 2026

बलिदानाचा अर्थ

Image
◆बलिदानाचा अर्थ◆ रोज नव्या भोंदू बुवाचा चमत्कार इथे घडतोय साऱ्या व्यवस्थेचा मेंदू यामुळेच तर सडतोय कधी येईल विवेकाला जाग ? हा प्रश्न मनाला छळतोय डॉक्टर तुमच्या बलिदानाचा अर्थ कुणाला कळतोय ? ज्यांनी धर्म शिकवायचा त्यांची आज शरम वाटते ज्यांच्यामुळे शांती यावी त्यांची मनात भीती दाटते त्यागाचा मुकुटमणी व्हावा तो नको तिथे लोळतोय डॉक्टर तुमच्या बलिदानाचा अर्थ कुणाला कळतोय ? सत्य असत्य पाहण्याची कुठे भक्तांना शुद्ध असते ? आमच्याच बांधवांशी आमचे खुले युद्ध असते सारा देश अभक्तांनी इथून तिथून जळतोय डॉक्टर तुमच्या बलिदानाचा अर्थ कुणाला कळतोय ? तुकारामांच्या भाषेत बुडणारे डोळ्यांनी पाहवत नाही उगाच शांत बसावे हे मनाला राहवत नाही तुमच्या मार्गाने जाणाऱ्यांना इथला अधर्म गिळतोय डॉक्टर तुमच्या बलिदानाचा अर्थ कुणाला कळतोय ? लोकांना विचाराने येणार नाही निदान दुष्कृत्यांने जाग येईल आपण किती भाबडे आहोत याचाही कधी राग येईल नाहीतर कुत्रं पीठ खातंय आंधळा आपला दळतोय डॉक्टर तुमच्या बलिदानाचा अर्थ कुणाला कळतोय ? ◆श्रीकृष्ण उबाळे,बीड ◆मो.9405344642 #बलिदानाचा_अर्थ #नरेंद्रदाभोळकर #अंधश्रद्धा_निर्मूलन ...

एक गॅसची टाकी आणि चार तासांचा संघर्ष

Image
◾एक गॅसची टाकी आणि चार तासांचा संघर्ष◾           बुधवारी आमच्या घरचा गॅस संपला आणि घरात स्वयंपाक थांबण्याची वेळ आली. आजपर्यंत आम्ही गॅस एजन्सीच्या होम डिलिव्हरी करणाऱ्या रिक्षावाल्याला फोन करून गॅस मागवत होतो. दोन तासात गॅस घरी येत असे. पण यावेळी फोन केला तर त्याने सांगितले की आता होम डिलिव्हरी बंद केली आहे, तुम्ही बुकिंग करून दोन दिवसांनी एजन्सीवरून गॅस घ्या. त्याप्रमाणे मी लगेच आयव्हीआरवर फोन करून गॅस बुकिंग केली. बुकिंग नंबरही मिळाला, पण त्याचा मेसेज काही आला नाही. शुक्रवारी दुपारी तीन वाजता मी गॅस एजन्सीवर गेलो. तिथे गेल्यावर त्यांनी ओटीपी दाखवा असे सांगितले. मी आयव्हीआरवर मिळालेला बुकिंग नंबर दाखवला, पण त्यांनी सरळ सांगितले की मेसेज असेल तरच गॅस मिळेल. माझी समस्या समजून घेण्याऐवजी त्यांनी एक प्रकारे मला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. शेवटी एका व्यक्तीला बोलावून माझी माहिती तपासायला सांगितले. त्या व्यक्तीने मोबाईल ऍपवर माझे केवायसी तपासले. सर्व काही व्यवस्थित होते. मग त्याने माझ्याच मोबाईलवरून पुन्हा बुकिंग केली. त्यानंतर जो मेसेज आला तो पाहून ...

संत तुकाराम महाराज जन्म विशेष

Image
◾अभंग तुकाराम-अखंड तुकाराम ◾              वसंत पंचमीच्या पवित्र दिवशी, तारखेनुसार २ फेब्रुवारी १६०८ रोजी महाराष्ट्राच्या भूमीत एका विलक्षण आत्म्याचा जन्म झाला, तो म्हणजे संत तुकाराम महाराज. त्यांच्या जन्मतारखेबाबत मतभेद असले तरी त्यांच्या विचारांबाबत, त्यांच्या संतत्वाबाबत आणि त्यांच्या समाजपरिवर्तनाबाबत कुठलाही मतभेद नाही, कारण तुकाराम महाराज हे केवळ एका काळापुरते मर्यादित न राहता सर्व काळासाठी मार्गदर्शक ठरलेले महापुरुष आहेत. बोल्होबा व कणकई यांच्या पोटी जन्मलेले तुकाराम महाराज लहान वयातच आयुष्याच्या कठोरतेला सामोरे गेले. वडिलांचा मृत्यू, आईचा मृत्यू, मोठ्या भावाचे घरातून निघून जाणे, भावाच्या पत्नीचा मृत्यू आणि स्वतःच्या मुलाचा व पहिल्या पत्नीचा मृत्यू अशा भीषण दुःखांचा मारा त्यांच्या आयुष्यावर झाला, परंतु या दुःखांनी त्यांना मोडले नाही, उलट त्यांचे मन अधिक अंतर्मुख, अधिक संवेदनशील आणि अधिक भक्तीमय बनले. लहान वयातच त्यांच्या खांद्यावर संसाराचा मोठा भार पडला, व्यापाराची जबाबदारी, कर्जाचे ओझे आणि कुटुंबाची काळजी या सगळ्यांत अडकून असतानाही त...

मन जिंकलं तर जग जिंकता येत

Image
         ❤️अनुभव आले अंगा❤️ ◾मन जिंकलं तर जग जिंकता येत◾          कोरोनाचं लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल झालं होतं. अनेक महिने घरात बंदिस्त असलेलं मन मोकळ्या श्वासासाठी आसुसलेलं होतं. शरीर बाहेर पडायला तयार होतं. अशा वेळी बीडमधील आमच्या देवराई ग्रुपमध्ये एक निर्णय झाला- 'यावेळी वासोटा किल्ला सर करायचा...!' वासोटा… सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्याच्या घनदाट जंगलात वसलेला अती दुर्गम वनदुर्ग. केवळ ट्रेकिंग नव्हे, तर इतिहासाशी थेट संवाद साधणारा अनुभव. निघायच्या आदल्या दिवशीच आम्ही मुक्कामी पोहोचलो. पहाटे लवकर उठून तयारी केली आणि शिवाजी सागर जलाशयातून बोटीत बसलो. कोयना धरणाच्या अथांग पाण्यावरून जाताना सभोवतालचं वातावरण विलक्षण गंभीर वाटत होतं. डोंगररांगा, पाण्यावर पडलेली सकाळची कोवळी ऊन आणि शांततेत मिसळलेला इतिहास.....मन नकळत शिवकाळात हरवून गेलं. वनविभागाच्या चेक पॉईंटवर पोहोचलो. प्लास्टिक बाटल्या, सामान यांची काटेकोर तपासणी झाली. कारण हे जंगल म्हणजे निसर्गाचं पवित्र मंदिर आहे. तिथून पुढे सुरू झाला खरा कसोटीचा प्रवास. जंगलातून वासोट्या...

गरज सरोआणि वैद्य मरो

Image
◾गरज सरो आणि वैद्य मरो ◾            एखाद्या कादंबरीत असावी अशी घटना. चार वर्षांपूर्वी बीड शहरात घडलेली. माणसाच्या स्वार्थी वृत्तीचं, उपकार विसरण्याचं आणि गरज संपली की माणसं कशी बदलतात याचं जिवंत उदाहरण. बीड येथील एका सामाजिक संस्थेने मोठ्या कष्टानं वृद्धाश्रम सुरू केलं होतं. फार मोठ नाही, पण स्वच्छ, माणुसकी जपणारं, प्रेमाने चालणारं. तेथे येणारे वृद्ध म्हणजे आयुष्याने थकलेले, नात्यांनी फसवलेले, संसाराने झिजवलेले. अशाच एका दुपारी आश्रमाच्या दारात एक वृद्ध जोडपं उभं होतं. साधी कपडे, अंगावर थकव्याची झाक, डोळ्यांत भीती आणि आसरा द्यावा ही अपेक्षा यांचा विचित्र संगम. वय साधारण साठच्या आसपास. त्यांना मुलबाळ नव्हते. आयुष्यभर सरकारी सेवेत काम केलेलं. पती मंडळ अधिकारी होते. पण काही कारणाने त्यांची सरकारी सेवेतून बडतर्फी झाली होती. ती अन्यायकारक असल्याचं त्यांना वाटत होतं, म्हणून त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. केस चालू होती. पण केस चालू असताना नोकरी गेली, पगार थांबला, आणि आयुष्याची गाडी रुळावरून घसरली.नोकरी हेच त्यांचं जगण्याचं एकमेव साधन होतं. सुरुवा...

गाडगेबाबांचे आमच्या गावातील कीर्तन

Image
◾गाडगेबाबांचे आमच्या गावातील कीर्तन◾          खूप वर्षांपूर्वीचा तो दिवस…माझे आजोबा रामराव माधवराव उबाळे सांगायचे, तेव्हा त्यांचे वय अवघे सोळा वर्षे होते. पाच वर्षांपूर्वी वयाच्या शंभरव्या वर्षी त्यांचे निधन झाले. चऱ्हाटा ता. बीड गाव तसं लहानसं, साधंसुधं. सर्व जाती धर्माचे लोक गावात राहायचे. कच्च्या गल्ल्या, विहिरीचं पाणी, लाईट नाही, संध्याकाळ झाली की टेंभ्यांचा उजेड. आजोबांच्या आठवणीतला तो प्रसंग मात्र आजही जिवंत होता. वयाच्या एकशेएक वर्षांपर्यंत त्यांनी तो तितक्याच जिवंतपणे सांगितला. त्या दिवशी सकाळी सकाळी गावाच्या वेशीवरून एक विचित्र माणूस चालत आला. पांढरीशुभ्र दाढी, उंच, रांगडा देह; पण अंगावर फाटक्या चिंध्या. डोक्यावर कापड गुंडाळलेलं आणि त्यावर मडक. लोकांनी पहिल्यांदा पाहिलं आणि मनात आलं हा कुठला फकीर ? कुठून आला असेल? तो माणूस थेट गल्लीमध्ये गेला. खेळत असलेल्या बारक्या पोरांना हाक मारली.“अरे पोरांनो, या रे… काम आहे.” पोरं कुतूहलानं गोळा झाली. त्यानं कुठलीही कथा सांगितली नाही, उपदेश केला नाही. हातात खराटा घेतला आणि म्हणाला, “चला, गाव झाडून काढूया...

उपेक्षित महानायिका सावित्रीबाई फुले

Image
◾उपेक्षित महानायिका सावित्रीबाई फुले◾              आपले महाराष्ट्र राज्य हे प्रगतीशील राज्य म्हणून गणले जाते. इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यात शिक्षण खासकरून स्त्री शिक्षण जास्त प्रमाणात आहे. अनेक सामाजिक बदलांचे नेतृत्व महाराष्ट्राने केले आहे. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत तर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला तोड नाही. आज भारतात प्रत्येक क्षेत्रात स्त्रीयांनी यशस्वीपणे प्रवेश करून पुरुषांची मक्तेदारी कमी केली आहे. कुठल्याही शाळा-महाविद्यालय, विद्यापीठ, बोर्ड किंवा स्पर्धा परीक्षा यामध्ये मुलींनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून आम्ही कुठेच कमी नाही यावर मोहर उमटवली आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण, आमदारकी खासदारकी, मंत्री, मुख्यमंत्री एवढेच काय भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत गवसणी घालण्याचा मान स्त्रीला प्राप्त झाला. या सर्वांसाठी ज्या देवीने पाया तयार करून ठेवला, स्वतःला संपवून घेतलं त्या सावित्रीबाई फुले यांच्या विषयी किती जणांच्या खासकरून जणींच्या मनात भाव आहे ? त्यांच्याविषयीची सामान्य जाणीव किती आया-बायांना आहे ? हा प्रश्न ...

अस्पृश्यता निर्मूलणासाठी सर्वस्व अर्पण करणारा 'संत' विठ्ठल रामजी शिंदे

Image
अस्पृश्यता निर्मूलणासाठी सर्वस्व अर्पण करणारा 'संत' विठ्ठल रामजी शिंदे           महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील उपेक्षित, बहिष्कृत आणि दलित घटकांच्या उन्नतीसाठी वेचले. समाजसुधारणेच्या मार्गावर चालताना त्यांनी स्वतःच्या सुख, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेचा विचार न करता मानवी समतेचा ध्यास अखेरपर्यंत जपला. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटक राज्यातील जमखंडी संस्थान येथे एका खानदानी मराठा कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामजीबाबा आणि आई यमुनाबाई. घराणे पूर्वी श्रीमंत होते; मात्र कालांतराने ही श्रीमंती ओसरली आणि गरिबीने घरात प्रवेश केला. वडील रामजीबाबा काही काळ संस्थानात शिक्षक व कारकुनी स्वरूपाची नोकरी करीत होते. ते पंढरपूरचे वारकरी असल्याने घरात भक्ती, सात्त्विकता आणि साधेपणाचे वातावरण होते. आई यमुनाबाई सात्त्विक वृत्तीची असून घरातील वातावरण जातिभेदाला थारा न देणारे होते. याच वातावरणामुळे लहानपणापासूनच विठ्ठलरामजींच्या मनात माण...