Posts

Showing posts from June, 2025

संत सोयराबाई

Image
●◆तुकोबांचे शब्दधन ◆● अवघा रंग एक झाला ।  रंगी रंगला श्रीरंग ॥१॥ मी तूंपण गेलें वायां ।  पाहतां पंढरीच्या राया ॥२॥ नाही भेदाचें तें काम ।  पळोनी गेले क्रोध काम ॥३॥ देही असुनी तूं विदेही ।  सदा समाधिस्थ पाही ॥४॥ पाहते पाहणें गेलें दुरी ।  म्हणे चोख्याची महारी ॥५॥ संपूर्ण शरीर, मन, आत्मा एकाच रंगात रंगून गेले. तो म्हणजे ईश्वराचा रंग. संपूर्ण अस्तित्व विठोबा श्रीरंगाच्या भक्तिरसात पूर्णपणे ओतप्रोत झाले. "मी" आणि "तूं" असा भेदच उरला नाही. पंढरपूरच्या विठोबाला पाहताच माझं "स्वत्व" नष्ट झालं, केवळ ईश्वरच शिल्लक राहिला. भक्त आणि भगवंत यांच्यातील भेदभाव नाहीसा झाला. तसेच इतर भेदाभेद नष्ट झाले. क्रोध, वासना, वाईट विचारही निघून गेले, मन शुद्ध झालं. तूं (विठोबा) शरीरात असूनही देहाच्या पलीकडचा आहेस . सदैव समाधीस्थितीत, निर्विकार, परम शांतीत असलेला आहेस. मी पाहत असताना "मी पाहते आहे" ही जाणीवही नष्ट झाली. द्रष्टा, दर्शन आणि दृश्य एकरूप झाले, असं चोखामेळ्यांची पत्नी संत सोयराबाई म्हणतात. हा अभंग आत्मानुभवाची परमोच्च अवस्था दर्शवतो. जिथे भक्त, भगवान...

वाट ही चालावी पंढरीची

Image
टाळी वाजवावी गुढी उभारावी ।  वाट हे चालावी पंढरीची ॥१॥ पंढरीचा हाट कउलांची पेठ ।  मिळाले चतुष्ट वारकरी ॥२॥ पताकांचे भार मिळाले अपार ।  होतो जयजयकार भीमातीरी ॥३॥ हरिनाम गर्जतां भय नाहीं चिंता ।  ऐसें बोले गीता भागवत ॥४॥ खट नट यावें शुद्ध होऊनि जावें ।  दवंडी पिटी भावें चोखामेळा ॥५॥ हाताने टाळी वाजवावी, खांद्यावर ध्वज घ्यावा आणि भक्तांनी पंढरपूरच्या दिशेने निघावे. भक्तिभावाने उत्साहात टाळ वाजवत, विजयाची गुढी हाती घेऊन पंढरपूरच्या वारीच्या वाटेवर चालायला हवे.  पंढरी म्हणजे जणू एक भक्तीची पेठ आहे, जिथे भक्त (वारकरी) चारही दिशांमधून एकत्र येतात. पंढरपूर हे भक्तांचे धर्मपीठ असून, इथे चारही दिशांमधून आलेले वारकरी एकवटतात. हाती ध्वज (पताका) घेऊन हजारो वारकरी एकत्र होतात आणि भीमा नदीच्या काठी जयघोष करतात. भीमा नदीच्या किनाऱ्यावर अनंत पताका फडकत असतात आणि भक्तजनांचा जयजयकार आसमंत दुमदुमवतो. हरिनामाचा उच्चार करताना ना भय उरतं, ना चिंता. गीता आणि भागवतही हेच सांगतात. हरिनामस्मरण हेच चिंता, भय आणि दुःखाचा नाश करणारे आहे. भगवद्गीता व भागवत धर्मग्रंथ देखील हेच...

विठ्ठल माहात्म्य: संत मुक्ताबाई महाराज

Image
"मुक्त जीव सदा होति पैं नामपाठें ।  तेचि रूप विटे देखिलें आम्हीं ॥१॥ पुंडलिके विठ्ठल आणिला पंढरी।  आणूनि लवकरी तारिलें जग ॥२॥ ऐसें पुण्य केलें एका पुंडालिकेची।  निरसली जनाची भ्रमभूली ॥३॥ मुक्ताई चिंतनें मुक्त पैं जाली।  चरणीं समरसली हरिपाठे ॥४॥"  जो जीव (माणूस) भगवानाचं नामस्मरण (नामजप) सतत करतो, तो नेहमीसाठी मुक्त होतो. आम्ही देखील पंढरपूरच्या विटेवर त्या नामाच्या रूपातच विठ्ठलाचं दर्शन केलं आहे.   पुंडलिकाच्या भक्तीमुळेच विठ्ठल पंढरपूरात आले. त्यानं इतक्या सहजतेने आणि लवकर भक्तीच्या जोरावर संपूर्ण जगाला तारण्याचं काम केलं. एका पुंडलिक नावाच्या भक्तानं इतकं मोठं पुण्य केलं की, त्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या मनातील अज्ञानरूपी भ्रम नाहीसे झाले (निरसले). संत मुक्ताबाई महाराज म्हणतात, "मी भगवंताचं चिंतन केलं आणि मी स्वतः मुक्त झाले. मी भगवंताच्या चरणांमध्ये हरिपाठ करत करत पूर्णपणे एकरूप झाले." नामस्मरण, भक्ती, आणि पंढरीतील संतांची साधना याचा महिमा वर्णन केला आहे. नामस्मरणामुळे जीव मुक्त होतो. पुंडलिकाच्या भक्तीनं विठ्ठल पृथ्वीवर आला. न...

लोकराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज – समतेचे शिल्पकार

Image
◆●लोकराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज – समतेचे शिल्पकार●◆ ◆श्रीकृष्ण महाराज उबाळे ◆मो.9405344642 भारतीय इतिहासातील जे थोडे फार राजे केवळ राजसत्तेपुरते मर्यादित न राहता समाज परिवर्तनाचे कार्य करू शकले, त्यात सर्वप्रमुख नाव म्हणजे छत्रपती शाहू महाराज. त्यांचे कार्य, विचार आणि निर्णय केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित नव्हते, तर ते आजच्या लोकशाही व्यवस्थेच्या गाभ्याशी सुसंगत आहेत. म्हणूनच त्यांना “राजर्षी”, “लोकराज” ही बिरुदं मिळाली, आणि ती त्यांनी त्यांच्या कार्याने सार्थही केली. १. सामाजिक समतेसाठी झगडणारा राजा : शाहू महाराजांचा कार्यकाळ म्हणजे समाजात खोलवर रुजलेल्या जातिभेद आणि विषमतेविरुद्धचा संघर्ष. त्यांना कळून चुकले होते की देशातील बहुसंख्य लोक वंचित, शोषित आणि दलित आहेत, आणि जोपर्यंत या घटकांना समान अधिकार, शिक्षण आणि संधी मिळत नाही, तोपर्यंत खरी प्रगती शक्य नाही. त्यांनी वंचित समाजासाठी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक सुधारणा राबवून त्या वर्गांना नवजीवन दिलं. मंदिर प्रवेश, विहिरींचा वापर, शाळांमध्ये प्रवेश, सार्वजनिक ठिकाणी समान वागणूक यासाठी त्यांनी अनेक कठोर आणि क्रांतिकारक...

संत जनाबाई वारी अभंग

Image
"कीर्तनाचा रस आवडे नरासी ।  लागती पायांसी मुक्ति चार्‍ही ॥१॥ वारी पंढरीचा निश्चयें म्यां केला ।  वारकरी झाला पंढरीचा ॥२॥ मोक्षाचा जो मोक्ष मुक्तीची जे मुक्ती ।  जनी म्हणे किती सांगुं फार ॥३॥" माणसाला कीर्तनाचा (भगवंताच्या नामस्मरणाचा, भजनाचा, प्रवचनाचा) रस आवडू लागतो, तेव्हा त्याच्या चरणी (पायाशी) चारही मुक्ती (सालोक्य, सामीप्य, सारुप्य, सायुज्य) आपोआप येऊन उभ्या राहतात. भक्तीच्या मार्गानेच मुक्ती मिळते, असा हा भाव आहे. मी पंढरपूरच्या वारीचा ठाम निश्चय केला आहे. त्यामुळे मी आता खरा पंढरीचा वारकरी झालो आहे. (वारी म्हणजे केवळ चालण्याचे कष्ट नव्हे तर अंतःकरणाने विठोबाला समर्पण.) संत जनाबाई महाराज म्हणतात, "मोक्षामध्ये जो खरा मोक्ष आहे, मुक्तीत ज्या मुक्तीचा सार आहे तो वारीत आहे. हा अनुभव मी मिळवला आहे. मी हे किती सांगू, शब्द अपुरे पडतात. हा माझा  अनुभव खूप गूढ आणि व्यक्तिगत आहे." जय जगद्गुरू....! जय विठ्ठल....! ◆श्रीकृष्ण महाराज उबाळे ◆मो.9405344642 #वारीचीभावना #कीर्तनसेमुक्ती #वारकरीसंप्रदाय #पंढरीचीओढ #हरिपाठाचीगोडी #विठूमाउली #भक्तीरस #नामस्मरण #मुक्तीच...

संत नामदेव महाराज अभंग

Image
भेटिलागीं माझा फुटतसे प्राण । काया वाचा मनें जीवेंभावें ॥१॥ जया देखे तया पुसें हेंचि मात । कैं मज अनंत बोलावील ॥२॥ संतसमागमें दसरा दिवाळी । ठेवूनि निढळीं बाहे सदा ॥३॥ सखे पंढरीचे येती वारकरी । आर्त निरंतरीं त्यांचे पायीं ॥४॥ नामा म्हणे ऐसें करी दंडवत । आमुतें पुनीत करी बापा ॥५॥ भगवंताची भेट घडावी म्हणून माझा जीव तळमळतो आहे. शरीर, वाणी, मन, प्राण आणि भावनांनाही भगवंताच्या भेटीची आस लागली आहे. प्रत्येक अंगामधून, विचारांमधून, भावनांमधून एकच आर्त ध्वनी उमटतो — "मला माझा पांडुरंग भेटावा...!'' ही उत्कंठा इतकी तीव्र आहे की, भक्ताचं अस्तित्वच केवळ भगवंताच्या भेटीसाठी झुरतं आहे. जे कोणी भेटेल, त्याला मी हेच विचारतो- "अनंत (भगवंत) मला कधी भेटणार? तो मला कधी बोलावणार?" संत नामदेव महाराजांचा जीवच इतका अनावर झाला आहे की, प्रत्येक माणसाकडे त्यांना एकच प्रश्न पडतो-"माझ्या पांडुरंगाची भेट कधी होईल ?" ही भावना भक्ताच्या अंतर्मनातील अखंड, अधीर प्रश्न आहे. संतांचा संग म्हणजे माझ्यासाठी दसरा आणि दिवाळी..! भक्त असे म्हणतो की, सणवार नसले तरी संतांचा संग मला सदैव ...

फक्त करिअर नाही, माणूस घडवा...मुलांना जगुद्या......!!

Image
"फक्त करिअर नाही, माणूस घडवा...मुलांना जगुद्या......!!" ◆श्रीकृष्ण उबाळे, बीड ◆मो.9405344642 आजच्या शिक्षणाच्या स्पर्धेत आपण एक महत्त्वाचा मुद्दा विसरतोय — आपलं मूल माणूस आहे, मशीन नाही! आज IIT, NEET यांसारख्या स्पर्धा परीक्षांनी कित्येक मुलांचे भवितव्य सरळ न करताच, वाकडं केलं आहे. परीक्षा फक्त ज्ञानाची कसोटी नसून, ती अनेकदा मुलांच्या मानसिक आरोग्याचीही परीक्षा ठरते. पालक, शिक्षक आणि समाज यांचं एकच स्वप्न — "माझं मूल इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हावं." पण का? मुलांची खरी क्षमता, त्यांची आवड, त्यांचं वेगळेपण का स्वीकारत नाही आपण? फक्त दोनच क्षेत्रं भवितव्य घडवतात का? साधना भोसले. डॉक्टर होण्यासाठी धडपडत होती. पण तिला हे क्षेत्र झेपलं नाही. तिच्यावर लादलेलं स्वप्न तिच्या वडिलांनी लाकडाच्या दंड्याने मोडून टाकलं — तिला मारूनच टाकलं. का? कारण तिला 'डॉक्टर' होणं जमलं नाही. पण ती जर डॉक्टर झाली नसती, तरी ती 'काहीतरी' झाली असती — एक चांगली शिक्षक, लेखिका, कलाकार, शास्त्रज्ञ किंवा समाजसेविका किंवा चांगली गृहिणी झाली असतीच ना...! तिच्या अस्तित्वालाच आपण...

रिक्षातून स्वप्नांच्या रुग्णालयात- सुमीत बरदाडेची प्रेरक यशोगाथा-नीट परीक्षेत ५११ गुण

Image
रिक्षातून स्वप्नांच्या रुग्णालयात- सुमीत बरदाडेची  प्रेरक यशोगाथा बीड तालुक्यातील जाधववाडी गावातील बनणार पहिला 'डॉक्टर' ◆श्रीकृष्ण उबाळे, बीड ◆मो.9405344642 बीड:  स्वप्नं मोठी पाहायची, कारण तीच आपल्याला आयुष्याच्या पुढच्या थांब्यावर पोहोचवतात..कधी कधी, मोठ्या शहरात नाही, तर एखाद्या छोट्याशा गावात एक मोठं स्वप्न उगवतं...जसं नाव जाधववाडी. बीड तालुक्यातील च-हाटा ग्रामपंचायतीमधील हे छोटंसं, पण जिद्दी स्वप्न असलेलं गाव. आणि इथलंच एक तेजस्वी स्वप्न म्हणजे — सुमीत संजय बरदाडे. सुमीतचे वडील संजय बरदाडे यांचे शिक्षण बारावीपर्यंत. आई अर्चना ताईंचं शिक्षण दहावीपर्यंत. घरात शेती थोडीशीच. जगायचं कसं? तर वडील दिवसभर आपल्या आप्पे रिक्षावर लोकांना ने-आण करत राहतात. स्वप्न कोणतं होतं? घरातला मुलगा एक दिवस डॉक्टर व्हावा...शेवटच्या गावातल्या रुग्णालाही हाक मारणारा, दिलासा देणारा डॉक्टर. कदाचित रिक्षाच्या आवाजातच सुमीतने जिद्द ऐकली...आणि वडिलांच्या घामातच स्वतःचं भवितव्य पाहिलं. शाळा गावी, अभ्यास मनापासून केला. सुमीतचं शिक्षण सुरू झालं जि.प. प्राथमिक शाळा, जाधववाडी इथून. पाचवी...

Where Has God Gone?

Image
 "Dev Gela Kunikade" by Shrikrishna Ubale, Beed: Where Has God Gone? (Translated from Marathi) I had heard in my childhood, That God is in every grain, God lives in every heart, You can see Him in all creation, He resides in every home. But there were bomb blasts in Mumbai, So many innocent people died. There was an attack on America too, Dead bodies were seen everywhere. The Taliban destroyed the statues of Buddha, America attacked Iraq and Afghanistan, And lakhs of innocents lost their lives. ISIS killed people across the world, Evil forces crushed humanity, In Pakistan, Hindus die every day, Why don’t we see even a drop of help? In Israel, Palestine, Iran, Russia, Ukraine— So many innocents are dying there too. Where are you, Creator of the world? Where are you, the Father of our faith? There are tsunamis, Floods come, Storms hit, Riots happen too, And in all this, People suffer terribly. Every day in this world, So much pain must...

जिद्दीचा विक्रम: डॉ. संजय जानवळे यांनी गाठले जागतिक यश

Image
जिद्दीचा विक्रम: डॉ. संजय जानवळे यांनी गाठले जागतिक यश ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ या अतिशय कठीण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ९० कि.मी. पल्ला गाठून ठरले 'रण'वीर ◆श्रीकृष्ण उबाळे,बीड ◆मो.9405344642 बीड:- बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय जानवळे यांनी आपल्या ध्येयवेड्या प्रवासाने संपूर्ण मराठवाड्याचे नाव जागतिक व्यासपीठावर झळकावले आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ या अतिशय कठीण व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी ९० किलोमीटरचा खडतर पल्ला अवघ्या ११ तास ३७ मिनिटांमध्ये पूर्ण करत इतिहास रचला. जगभरातील ७० देशांतील तब्बल २३,००० धावपटूंमध्ये चमकदार कामगिरी करत त्यांनी पीटरमारीत्जबर्ग ते डर्बन असा चढउताराने भरलेला रस्ता पार केला.  या स्पर्धेत बीडच्या डॉ.विश्वास गवते, हरिभाऊ ठोंबरे यांनीही सहभाग घेतला होता. ही स्पर्धा केवळ शरीराची नव्हे, तर मनाचीही परीक्षा घेणारी होती. या थरारक क्षणांचे वर्णन करताना डॉक्टर म्हणाले, "धावताना प्रत्येक पावलाला एक नवा आव्हान वाटत होता, पण मनात फक्त एकच गोष्ट होती – हार मानायची नाही." ◆डॉक्टरांचा ...

वैभवी देशमुख – अश्रूंमधून उभं राहिलेलं यश

Image
वैभवी देशमुख – अश्रूंमधून उभं राहिलेलं यश बारावीला ८५%  तर निटमध्ये मिळवली पात्रता ◆ श्रीकृष्ण उबाळे, बीड ◆मो.9405344642 महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एक छोटंसं गाव – मस्साजोग...! इथूनच जन्माला आली एक मुलगी – वैभवी देशमुख......! आई-वडिलांचं आर्जव, गावकऱ्यांचा जीव की प्राण असलेले सरपंच संतोष देशमुख यांची लाडकी लेक. पण नियतीनं क्रूर खेळ मांडला...एक दिवस अचानकच एक हृदयद्रावक घटना घडली – संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. महाराष्ट्र हादरला. संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त झाली. पण या काळोख्या घटनेच्या सावलीतही एक तेजस्वी दिवा शांतपणे पेटलेला होता – वैभवी. आईचं अश्रूंनी ओथंबलेलं पदर, समाजाचं सांत्वन, पोलिस चौकशी, कोर्ट-कचेऱ्या…हे सगळं चालू असतानाही वैभवीच्या हातात कायम एक पुस्तक होतं. दोन तासांचा अभ्यास तिनं एका मिनिटासाठीही थांबवला नाही. वडिलांच्या चेहऱ्याचं शेवटचं स्मरण हृदयात साठवून तिनं आपली ध्येयशक्ती दुपटीनं वाढवली. वडिलांना न्याय मिळावा म्हणून ती प्रत्येक आंदोलनात, मोर्चात पुढे होती. आणि घरी आल्यावर पुन्हा शांतपणे अभ्यासाच्या पुस्तकात डोकं खुपवायची. कितीही अश्रू आले ...

मारुती चितमपल्ली – निसर्गाची भाषा बोलणारे अरण्य'ऋषी'

Image
मारुती चितमपल्ली – निसर्गाची भाषा बोलणारे अरण्य'ऋषी'  ◆श्रीकृष्ण उबाळे, बीड आज, १८ जून २०२५ रोजी, महाराष्ट्राने आणि मराठी भाषेने आपला एक अजरामर साहित्यिक, निसर्गप्रेमी आणि भाषावैज्ञानिक हरवला आहे. मारुती चितमपल्ली हे नाव म्हणजे जंगलाची कुजबुज, पक्ष्यांची गूजगोष्टी, आणि मराठी भाषेचं लखलखीत सौंदर्य. त्यांचे साहित्य हे निसर्गाच्या हृदयाची भाषा आहे. ◆जन्म व बालपण : मारुती भुजंगराव चितमपल्ली यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९३२ रोजी सोलापूरला झाला.  बालपणी झाडं, पक्षी, प्राणी हे त्यांचे मित्र झाले, आणि निसर्ग हेच त्यांचं पहिलं विद्यालय ठरलं. ◆त्यांचं शिक्षण : शालेय शिक्षण सोलापूर येथे झाले. त्यांनी कृषी विज्ञान या शाखेत पदवी घेतली. पण त्यांची खरी आवड होती – वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र. त्यांचे अभ्यासक्षेत्र होते ‘निसर्ग आणि त्याचे अनेक पैलू.’ शिक्षण पूर्ण करून त्यांनी आयुष्यभर निसर्गाच्या भाषेचा शोध घेतला. ◆नोकरी व सेवा कारकीर्द : शिक्षण पूर्ण करून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारली. त्यांची नोकरी म्हणजे केवळ प्रशासन नव्हे, तर एक तीर्थयात्...

राजवीर कोकाटचे जेईई ऍडव्हान्सड परीक्षेत यश देशात 32वा

Image
◆●ड्रायव्हरचा मुलगा ठरला बीडचा अभिमान; जेईई ऍडव्हान्सड परीक्षेत देशात ३२वा क्रमांक●◆ अपंगत्वावर मात करत राजवीर कोकाटची आयआयटीत भरारी ◆श्रीकृष्ण उबाळे, बीड बीड – कष्ट करणाऱ्या आई-वडिलांच्या संघर्षातून उभं राहिलेलं एक स्वप्न... आणि त्या स्वप्नाला यशाच्या आकाशात भरारी देणारा राजवीर भरत कोकाट हा बीड जिल्ह्यातील एक विद्यार्थी. मूळ गाव गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथून आलेल्या राजवीरने जेईई ऍडव्हान्सड परीक्षेत अपंगांच्या खुल्या प्रवर्गातून संपूर्ण भारतात ९३वा तर अपंगांच्या इतर मागास प्रवर्गातून देशातून ३२वा क्रमांक पटकावत बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं नाव उज्वल केलं आहे. राजवीरचा प्रवास हा खरोखर प्रेरणादायी आहे. एका हाताने अपंगत्व असूनही त्याने कधीही हार मानली नाही. अभ्यासात सातत्य राखत तो यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला. त्याचे प्राथमिक शिक्षण ठाकर आडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत १ ली ते ७ वी पर्यंत झाले. त्यानंतर दहावीचे शिक्षण बीडमधील यशवंत विद्यालय येथे पूर्ण करत ७८ टक्के गुण मिळवले. बारावीचे शिक्षण त्याने साक्षाळपिंपरी कनिष्ठ महाविद्यालय येथे घेत ७९ टक्के ...