संत जनाबाई वारी अभंग

"कीर्तनाचा रस आवडे नरासी । 
लागती पायांसी मुक्ति चार्‍ही ॥१॥
वारी पंढरीचा निश्चयें म्यां केला । 
वारकरी झाला पंढरीचा ॥२॥
मोक्षाचा जो मोक्ष मुक्तीची जे मुक्ती । 
जनी म्हणे किती सांगुं फार ॥३॥"

माणसाला कीर्तनाचा (भगवंताच्या नामस्मरणाचा, भजनाचा, प्रवचनाचा) रस आवडू लागतो, तेव्हा त्याच्या चरणी (पायाशी) चारही मुक्ती (सालोक्य, सामीप्य, सारुप्य, सायुज्य) आपोआप येऊन उभ्या राहतात. भक्तीच्या मार्गानेच मुक्ती मिळते, असा हा भाव आहे.

मी पंढरपूरच्या वारीचा ठाम निश्चय केला आहे. त्यामुळे मी आता खरा पंढरीचा वारकरी झालो आहे.
(वारी म्हणजे केवळ चालण्याचे कष्ट नव्हे तर अंतःकरणाने विठोबाला समर्पण.)

संत जनाबाई महाराज म्हणतात, "मोक्षामध्ये जो खरा मोक्ष आहे, मुक्तीत ज्या मुक्तीचा सार आहे तो वारीत आहे. हा अनुभव मी मिळवला आहे. मी हे किती सांगू, शब्द अपुरे पडतात. हा माझा  अनुभव खूप गूढ आणि व्यक्तिगत आहे."

जय जगद्गुरू....!
जय विठ्ठल....!

◆श्रीकृष्ण महाराज उबाळे
◆मो.9405344642

#वारीचीभावना #कीर्तनसेमुक्ती #वारकरीसंप्रदाय
#पंढरीचीओढ #हरिपाठाचीगोडी #विठूमाउली
#भक्तीरस #नामस्मरण #मुक्तीचा_मार्ग #वारी_पंढरीची #वारीचीभावना #कीर्तनसेमुक्ती #विठूमाउली #पंढरीचीओढ #वारकरीसंप्रदाय #भक्तीरस

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'