व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत माझ्या बी.एस्सी.च्या वर्गातला एक शांत, मितभाषी मुलगा – अमोल राऊत. वर्गात फारसं बोलणं नाही, न दाखवणारी धडपड, पण मनामध्ये ध्येयाच्या दिशेने सतत चाललेला प्रवास. आज त्याच्या आयुष्याकडे मागे वळून पाहिलं, की खरंच हा पठ्ठ्या किती मोठा धाडसी निर्णय घेऊ शकतो याची जाणीव होते. १९८५ मध्ये त्याच्या वडिलांनी बीड शहरात “अंबिका भेळ” नावाचा एक छोटासा गाडा सुरू केला होता. साधा गाडा, साधी भेळ-पाणीपुरी, पण त्यात मेहनत, चव आणि प्रामाणिकपणा होता. त्या गाड्याने राऊत कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला, पण मोठ्या प्रमाणावर विस्तार होणं तसं शक्य नव्हतं. दरम्यान अमोलच्या शैक्षणिक वाटचालीत त्याला बँकेत कायम नोकरी मिळाली. अनेकांसाठी हे स्वप्नवत होतं – खात्रीशीर पगार, सुरक्षित भविष्य आणि समाजात मान. पण अमोलच्या मनात मात्र वेगळंच दडलेलं होतं. रोजच्या ऑफिसच्या टेबलावर बसताना त्याला जाणवायचं – “ही माझी खरी वाट नाही.” आणि मग एक दिवस त्याने ठरवलं. समाज काय म्हणेल, नातेवाईक काय विचार करतील याचा विचार न करता त्याने बँकेची क...
"ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत" ◆श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड ◆मो.9405344642 संतांची भूमी, भक्तीचा वारसा लाभलेली... बीड जिल्ह्यातील तळेगाव या छोट्याशा गावात जन्मलेला एक तेजस्वी, संतवाणीने झपाटलेला चेहरा – तो म्हणजेच ह.भ.प. योगेश महाराज घोलप. अत्यंत लहान वयातच कीर्तनाची गोडी लागलेली, आणि ती गोडी केवळ आवड नव्हे तर एक ध्यास बनली. आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत वारकरी धर्मशिक्षण घेतले आणि आपल्या आयुष्याचं उद्दिष्टच ठरवलं – “नामप्रचार आणि समाजप्रबोधन.” स्वतः:च आळंदी येथे "श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था" स्थापन करून आज ३५ विद्यार्थी नामधर्माच्या शिक्षणासाठी मार्गक्रमण करत आहेत, ही त्यांची सच्ची सेवा आहे. सोनी मराठी वाहिनीवरील "कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार" या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कीर्तन स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला आणि पहिल्याच फेरीत १०८ स्पर्धकांतून निवड झाली. ●पहिली फेरी – ‘नाम वाचे श्रवणी कीर्ती’ (संत निळोबाराय) ●दुसरी फेरी – ‘धर्माची तू मूर्ती’ (संत तुकाराम महाराज) आणि आता ●तिसरी व अंत...
●◆माझी बीजमाय 'संजीवनी'◆● तिचं नाव संजीवनी असलं तरी गावात सगळेजण तिला वहिनी म्हणतात. लहानपणापासून मी पण तिला वहिनीच म्हणायचो. पण लग्न झाल्यानंतर बायकोच्या सांगण्यावरून नकळत “आई” म्हणू लागलो. माझी ही माय – संजूबाई. शालेय शिक्षण तिचं झालेलं नाही. अक्षरं कधी हाताळली नाहीत. पण तिला शेतकीची, कुणबीकीची मात्र नैसर्गिक, अनुभवजन्य सविस्तर माहिती आहे. एखाद्या शेती खात्यातील अधिकाऱ्याला किंवा प्राध्यापकालाही रानपाला, झाडांची, वेलींची, पिकांची, फळांची माहिती नसेल एवढ्या माहितीचा साठा तिच्याकडे उपलब्ध आहे. ही माहिती तिला कामातूनच लहानापासूनच मिळाली. पानाफुलांचा, वेलवेलीचा, भाजीपाला आणि बियांचा संसार हे तिचे खरे विद्यापीठ. दर वर्षी पावसाळ्याच्या आधी आमचं घर बीजांचं गाठोडं बनतं. घरातल्या वाळक्या ओसरीवर, कुठे बांबूच्या टोपलीत, कुठे जुन्या साड्यांच्या गाठीमध्ये – वेगवेगळ्या बीजांचं संकलन ठेवलेलं असतं. वाळलेल्या वालाच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, शेगड्या, वांगं, टमाटर, चुका, शेपू – कितीतरी प्रकार. गावकऱ्यांच्या बायका येऊन “वहिनी, तुमच्याकडं बी मिळेल का?” असं विचारत...
Comments
Post a Comment