Posts

Showing posts from 2025

साने गुरुजी : माणुसकीचा दिवा पेटवणारा संत शिक्षक

Image
साने गुरुजी : माणुसकीचा दिवा पेटवणारा संत शिक्षक           महाराष्ट्राच्या मातीला जर कुणी माणुसकीचा सुगंध दिला असेल, तर तो साने गुरुजींनी दिला. पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं पूर्ण नाव. २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालगड या लहानशा गावात त्यांचा जन्म झाला. समुद्रकिनाऱ्याजवळचं ते गाव, साधी माणसं आणि कष्टकरी जीवन याच वातावरणात गुरुजी वाढले. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. वडिलांची नोकरी तुटपुंजी, आईचा संसाराचा ओढा मोठा. तरीही त्या घरात प्रेमाची, संस्कारांची आणि सत्याची कमी कधीच नव्हती. आईकडूनच गुरुजींना माणसावर प्रेम करायचं, दुःख पाहून गप्प बसायचं नाही, हे शिकायला मिळालं. बालपणापासूनच गुरुजींचं मन थोडं वेगळं होतं. इतर मुलं खेळात रमलेली असताना हा पोरगा पुस्तकात डोकं खुपसून बसायचा. अंगात साधे कपडे, पायात चप्पल नाही, पण डोळ्यांत मात्र मोठी स्वप्नं होती. शिक्षण घेत घेत ते पुणे, मुंबईपर्यंत पोहोचले. अभ्यासात हुशार असल्यामुळे नंतर शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. पण गुरुजींसाठी शिक्षक म्हणजे फक्त शाळेत तास घ्यायचा धंदा नव्हता. विद्यार्थ्यांच्य...

सगळे बिबटे मारून टाकले पाहिजेत.....!!

Image
सगळे बिबटे मारून टाकले पाहिजेत.....!!                 सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात तसेच प्रत्येक जिल्ह्यात, आपल्या बीडमधील आजूबाजूच्या तालुक्यांत आणि गावोगावी एकच चर्चा चालू आहे की बिबट्यांची दहशत वाढली, बिबट्या गावात शिरला, शेतात दिसतोय, माणसांवर हल्ले होतातायत. हे ऐकल्यावर भीती वाटणं साहजिक आहे, पण थोडं शांतपणे विचार केला तर कळतं की खरंतर दहशत बिबट्यांची नाही, दहशत आपल्या गैरसमजांची आहे. बिबट्या हा काही आज कालच जंगलातून बाहेर पडलेला प्राणी नाही, तो इथेच होता, आपल्या आजोबांच्या काळातही होता, फरक एवढाच आहे की तेव्हा जंगलं, झुडपं, डोंगररांगा होत्या, आज तिथं रस्ते झाले, कारखाने झाले, वसाहती वाढल्या, उसाची शेती सगळीकडं पसरली आणि बिबट्याचा आसरा कमी झाला. जिथं लपायला उस आहे, पाणी आहे, मोकाट कुत्रे आहेत, डुक्कर आहेत, शेळ्या, मेंढ्या आहेत, तिथं बिबट्या येणारच, त्याला गावात यायची हौस नसते, त्याला फक्त पोटाची आणि जगायची गरज असते. लोक म्हणतात बिबट्यांची संख्या फार वाढली, पण खरं सांगायचं तर बिबट्यांपेक्षा माणसांची संख्या आणि आपला निसर्गातला हस...

दत्ता झोडगेची कामगिरी

Image
एशिया मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये दत्ता झोडगेची सोनेरी कामगिरी ४०० मीटर आंतरराष्ट्रीय रिले स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक बीड (प्रतिनिधी) :  चऱ्हाटा (ता. बीड ) या क्रीडामय भूमीचा सुपुत्र दत्ता झोडगे याने चेन्नई येथे दि. ०५ ते ०९  नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या २३व्या ‘एशिया मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिप २०२५’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना ४×१०० मीटर रिलेस्पर्धेत सुवर्णपदक पटकावून अभूतपूर्व कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय यशामुळे चऱ्हाटा गाव, बीड जिल्हा, महाराष्ट्र राज्यासह भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकला आहे. दत्ता झोडगे हा गेल्या अनेक वर्षांपासून धावण्याच्या क्षेत्रात सातत्याने परिश्रम घेणारे, जिद्दी व शिस्तप्रिय खेळाडू म्हणून ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय धावण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदकांची श्रीमंती मिळवली आहे. सदरील स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धा सुरू असून त्यामध्ये भारतासह आशियातील विविध देशांमधून दोन हजारापेक्षा जास्त ॲथलेटिक्स खेळाडूंनी सहभाग नोंदवला. दत्ता झोडगे यांनी यापूर्वीही विविध राष्ट्री...

खरोखर 'तुकाराम' मुंढेंचे निलंबन नव्हे बडतर्फी करायला हवी...!!

Image
खरोखर 'तुकाराम' मुंढेंचे निलंबन नव्हे बडतर्फी करायला हवी...!!               आजही आपल्या समाजात सत्य बोलणारा, नियम पाळणारा आणि सरळ चालणारा माणूस ‘समस्या’ समजला जातो. इतिहासात संत तुकाराम महाराजांना तत्कालीन व्यवस्थेने सहन केले नाही, त्यांच्या अभंगांनी ढोंगीपणाचा मुखवटा फाडला म्हणून त्यांना विरोध झाला. आजचा काळ बदलला… पण ढोंगीपणा, भ्रष्टाचार, पूरकतेची मानसिकता अजिबात बदलली नाही. तुकाराम म्हणजे सत्यनिष्ठा. सत्यासाठी जगणे, सत्यासाठी उभे राहणे, सत्यासाठी झगडणे हीच त्यांची शिकवण. ते म्हणालेच आहेत : “सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे…” सत्यावर असंख्य अभंग....कारण त्यांना माहिती होते की मनुष्याला सर्वात कठीण गोष्ट म्हणजे सत्य जगणे.          आज या सत्यनिष्ठ विचारांचा वारसा पुढे नेणारा एक अधिकारी—तुकाराम मुंढे यांच्यावर कारवाईचे राजकारण सुरू आहे. कारण? ते नियम पाळतात. भ्रष्टाचार सहन करत नाहीत. सिस्टिममधील सडलेले चेहरे उघडे करतात.बोगस अपंग योजनेचा गैरवापर करणार्‍यांवर कारवाई करतात. आणि म्हणून त्यांना सतत बदली, निलंबन, दबाव याला स...

बीडच्या डोंगर पट्ट्यातील निवडुंग वनस्पती धोक्यात

Image
बीडच्या डोंगर पट्ट्यातील निवडुंग वनस्पती धोक्यात च-हाटा परिसरात पांढऱ्या रोगाचा फैलाव; निवडुंग मोठ्या प्रमाणावर नष्ट ◆श्रीकृष्ण उबाळे ◆मो.9405344642 बीड:  बीड जिल्ह्यातील डोंगराळ व कमी पावसाच्या पट्ट्यात नैसर्गिकरीत्या उगवणारी आणि पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत आवश्यक मानली जाणारी  निवडुंग वनस्पती  आज गंभीर संकटातून जात आहे. अलीकडच्या महिन्यांमध्ये  पांढऱ्या किडीचा (mealy bug)  प्रादुर्भाव एवढ्या वेगाने वाढला आहे की च-हाटा गावासह आसपासच्या संपूर्ण डोंगरपट्ट्यात ही वनस्पती  जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर  आली आहे. निवडुंगाच्या खोडावर पांढऱ्या रंगाचा चिकट थर दिसू लागतो आणि काही आठवड्यांतच संपूर्ण झाड व्यापून टाकतो. ही कीड रस शोषून घेत असल्याने झाड पूर्णपणे कमजोर होते, पिवळे पडते आणि अखेरीस पूर्णपणे सुकून जाते. गेल्या काही वर्षांत कधीही न दिसलेला एवढा मोठा प्रादुर्भाव या वर्षी प्रथमच नजरेस पडत असल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. ग्रामीण आणि डोंगराळ भागात निवडुंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो-माती धूप होऊ नये म्हणून  मृदासंरक्षण  करतो, ...

इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे...!'

Image
◆'इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे...!'◆ ◆ह.भ.प.श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड ◆मो.9405344642           आपल्या महाराष्ट्रामध्ये बळीराजा हा शब्द शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये नेहमी वापरण्यात येतो. शेतकऱ्याला बळीराजा असे म्हंटले जाते. महाराष्ट्र आणि बळीराजा यांचं किती जिव्हाळ्याचं नातं आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. म्हणून बलिप्रतिपदेच्या निमित्त बळीराजा कोण होता ? कसा होता ? या विषयी थोडीशी माहिती घेऊया.  ◆पुराणकथा◆     बळीराजाच्या संदर्भात महाभारत, भागवत आणि पद्मपुराण अशा विविध ठिकाणी कथा आढळते. पण गोष्ट अशी की प्रत्येक पुराणातील कथा वेगवेगळ्या आहेत. सर्वसामान्यपणे जी कथा सांगितली जाते ती अशी 'कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणतात. त्या दिवशी बळी व त्याची पत्नी विंध्यावली यांची पूजा केली जाते. असुर (राक्षस) यांचा राजा बळी हा प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. बळीराजा राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजादक्ष होता, दानशूरपणात खूप पुढे होता. त्याची शक्ती खूप वाढली होती. त्याने देव लोकांचा पराभव केला होता. मग व...

कुत्रे आणि समाज आरसा एकच आहे

Image
◆कुत्रे आणि समाज : आरसा एकच आहे...!◆             आजच्या समाजात ‘कुत्रे’ हा शब्द फक्त प्राण्यापुरता मर्यादित नाही. कुणाला कमी लेखायचं, कुणाचं वागणं दाखवायचं, कुणावर व्यंग करायचं- की झालं लगेच “अरे, तो तर कुत्र्यासारखा भुंकतो...!” असं म्हणतात. पण खरं सांगायचं तर, समाजातल्या अनेक प्रवृत्ती या अगदी कुत्र्यांसारख्याच झाल्या आहेत. कुत्रं भुंकण्यासाठी प्रसिद्ध आहे- कारण असो वा नसो, त्यांना भुंकल्याशिवाय चैन पडत नाही. आजची माणसंही तशीच झाली आहेत. सोशल मीडियावर, राजकारणात, गावपातळीवर... कुणी काही बोललं की लगेच टोळकं भुंकायला लागतं. तथ्य, विवेक, संयम या गोष्टींचं काही घेणंदेणं नाही- फक्त आवाज मोठा हवा एवढंच....! काही कुत्रे पाळीव असतात- मालकाच्या ‘छो’वर चालतात. समाजातही असे बरेच ‘पाळीव’ माणसे आहेत. नेता, संस्थाचालक, किंवा आर्थिक मालक जे म्हणतील तेच करायचं. विचार स्वतःचा नसतो, पण आदेश मिळाला की “तुटून पडायचं ” हाच त्यांचा धर्म. काही कुत्रे मात्र मोकाट असतात. मालक नाही, नियंत्रण नाही-जसं मनात येईल तसं वागतात. शहरात, गावात, गल्लीबोळात, पानटपरीवर सगळीकडे त्या...

एक अस्सल शिक्षक आणि संवेदनशील लेखक – प्रभाकरराव महाजन

Image
एक अस्सल शिक्षक आणि संवेदनशील लेखक – प्रभाकरराव महाजन              प्रभाकरराव महाजन (माजी मुख्याध्यापक, राजस्थानी विद्यालय, बीड)- हे नाव बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात आदराने घेतले जायचे. राजस्थानी विद्यालयाला ओळख निर्माण करून देणारे, अनुशासन, प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभाकरराव महाजन सर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेने केवळ निकालांची उंची गाठली नाही, तर संस्कारांचे झाड रुजवले. आज त्यांचा देह निखळला असला, तरी त्यांनी दिलेलं शिक्षण आणि विचारांची बीजं अनेकांच्या मनामध्ये कायम जिवंत राहतील. मी “चंपावती पत्र” या दैनिकामध्ये ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांवर आधारित ‘अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी’ या नावाने लेखमाला लिहीत होतो. त्या मालिकेतील एक लेख - “आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया”- सरांनी वाचला. त्या लेखाखाली मी दिलेली कथा त्यांना एवढी भावली की त्यांनी मला थेट फोन केला. फोनवरील त्यांचा आवाज अजूनही कानात घुमतो- “अहो, तुमचं नाव श्रीकृष्ण उबाळे का? च-हाटा गावचे का?” असं विचारून ते मनापा...

ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील- राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या राज्यप्रमुखपदी निवड

Image
ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील- राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या राज्यप्रमुखपदी निवड अध्यात्म, संस्कार आणि परिवर्तनाचा प्रवास              अध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारे आणि वारकरी संप्रदायातील नवे विचार रुजवणारे ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या महाराष्ट्र राज्यप्रमुखपदी निवड झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे वारकरी परंपरेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मुळशी तालुक्यातील मोसे खोरे या अतिदुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत त्यांचा जन्म झाला. कोणताही वारसा, पाठबळ किंवा आर्थिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी स्वतःच्या कष्टावर आणि श्रद्धेवर आपले व्यक्तिमत्त्व उभे केले. लहानपणापासूनच संसाराची जबाबदारी अंगावर घेत त्यांनी पाणीपुरीच्या गाडीवर काम, पेपर वाटप, इस्त्री काम, ऑफिस बॉय अशी विविध छोटीमोठी कामे केली. या कष्टांमध्येही त्यांच्या अंतःकरणात भक्ती, भजन आणि कीर्तनाची गोड झुळूक वाहत राहिली. बालवयापासूनच कीर्तन आणि गायनाची आवड असल्याने त्यांनी २०१६ पासून कीर्तन...

ज्ञानऋषींच्या दर्शनाने समृद्ध झालेला दिवस

Image
◆◆ज्ञानऋषींच्या दर्शनाने समृद्ध झालेला दिवस◆◆ (डॉ. आ. ह. साळुंखे सरांच्या भेटीचा अविस्मरणीय अनुभव)          कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात की त्या क्षणांचं स्मरण मनाला पुन्हा पुन्हा उभारी देतं, आत्मा प्रफुल्लित करतो आणि विचारांच्या नव्या वाटा दाखवतो. असा एक क्षण माझ्या आणि नितीन महाराज पिसाळ यांच्या आयुष्यात आला- जेव्हा आम्हाला आजच्या काळातील ज्ञानऋषी, मानवतावादी चिंतक आणि लोकशिक्षक डॉ. आ. ह. साळुंखे सर यांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा आणि संवादाचा योग आला. त्या दिवशी आम्ही कोल्हापूरमध्ये डॉ. जयसिंगराव पवार सरांचा निरोप घेऊन साताऱ्याकडे निघालो होतो. प्रवास जरी लांब होता, तरी मनात उत्साह ओसंडून वाहत होता. कारण आज आपण त्या व्यक्तिमत्त्वाला भेटणार होतो ज्यांनी महाराष्ट्रात विवेक, विज्ञाननिष्ठा, मानवता आणि तुकारामांच्या विचारांची आधुनिक व्याख्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवली आहे. सुमारे सायंकाळी पाचच्या सुमारास आम्ही साताऱ्याच्या बसस्थानकावर पोहोचलो. तिथून रिक्षा करून आम्ही गेंडामाळ येथे त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो. राकेश दादा- म्हणजेच साळुंखे सरांचे सुपुत...

“विष्ठेचे विज्ञान आणि श्रद्धेचा अंधार”

Image
🕊️ “विष्ठेचे विज्ञान आणि श्रद्धेचा अंधार” 🕊️ कधी काळी अहिंसेचे पुजारी म्हणून गौरवले जाणारे काही “मुनी” आज अशा हास्यास्पद विधानांनी स्वतःच्या बुद्धीला झटके देत आहेत की, ऐकणाऱ्याने हसावं की रडावं हेच कळेनासं होतं. अलीकडेच काही तथाकथित “धर्मगुरूंनी” कबुतरांना श्रद्धांजली देण्यासाठी एक भव्य प्रार्थना सभा घेतली आणि तिथे जे विचार मांडले ते अंधश्रद्धेच्या खाईत आपलं समाजजीवन किती खोल गेलं आहे याचं जिवंत उदाहरण ठरले. पहिला “मुनी” म्हणतो-“कबुतराच्या विष्ठेमुळे लोक मरले तर पर्वा नाही; झाडाचं पान अंगावर पडलं म्हणून पानाला दोष देणार का?” वा रे! काय विचारमंथन...! म्हणजे झाडाचं पान आणि कबुतराची विष्ठा यांच्यातला फरकच संपवला! डॉक्टर मूर्ख, पण हा मुनी ज्ञानी. मग माणसाने विज्ञान शिकायचंच कशाला, विष्ठाचं तत्त्वज्ञान पुरेसं आहे....! दुसरा “मुनी” तर याहून एक पाऊल पुढे. तो सांगतो- “कबुतराची विष्ठा औषधी आहे. तिचा धूर घेतला की मेंदू स्वच्छ होतो, ती पाण्यात भिजवून प्यायली की किडनीचे रोग दूर होतात!” असं काही ‘वैद्यकशास्त्र’ भारतात जन्माला आलं असतं, तर WHO ने औषधनिर्मिती बंद करून विष्ठेचा व्यापार स...

नेमबाजीची बक्षिसी

Image
◆●नेमबाजीची बक्षिसी●◆         बालपण म्हणजे निरागस खट्याळपणा. त्या वयात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायची आपली सवय असते. कुणाच्या बागेतून आंबे पाडणं, शेतातल्या झाडांवर चढणं, शाळेतून सुट्टी करून नदीत पोहायला जाणं – हे सगळं जरी त्या काळी फार मोठं वाटायचं, तरी आज आठवलं की चेहऱ्यावर एक वेगळंच हसू येतं. मी सहावी-सातवीत असेन. उन्हाळ्याची दुपार. शाळा सुटली होती आणि आम्हा मुलांच्या डोक्यात फक्त एकच विचार होता – आंब्याला पाड लागलाय, चला मग आंबे खाऊन येऊ. त्या काळी आंब्याचा प्रत्येक पाड आमच्या दृष्टीने खजिनाच होता. मांजरदरा शेतात भरत बाप्पूचं वावर होतं. त्या वावरात उभा असलेला "काळू-बाळू" नावाचा एक अफाट आंबा आम्हा मुलांचा आवडता होता. उंचीने मोठा, फांद्यांनी दाट आणि आंब्यांनी ओथंबलेला. आम्ही लांबूनच त्याच्याकडे बघत राहायचो. डोकं वर केलं की पिकलेले आंबे डोळ्यांना दिसायचे आणि तोंडाला पाणी सुटायचं. पण त्या आंब्याला एक मोठा अडसर होता – तीन-तीन आग्या मोहळं. मोहळाच्या माशांचा सैन्य त्या झाडाभोवती कायम घिरट्या घालायचं. साधा दगड झाडावर आदळला की माशा भुणभुण करत बाहेर पडा...

कमळाकर

Image
                 ◆●कमळाकर●◆             गाव म्हणलं की त्याच्या अंगणात आपोआप काही वैशिष्ट्यपूर्ण माणसं असतात. काही लोकं गावात जन्मलेली असतात, काही कुठून तरी आलेली असतात. पण त्या सगळ्या गर्दीत आपली छाप उमटवणारा माणूस कधी कधी असा असतो, ज्याला समाज "वेडा" समजतो. आमच्या च-हाटा ता.बीड गावात असाच एक माणूस होता – कमळाकर. तो आमच्या गावचा नव्हता. कुठल्या तरी ब्राह्मण कुटुंबातून आलेला. त्याची पत्नी आणि मुलगा बीडला किंवा कुठेतरी शहरात राहत होते. पण कमळाकर मात्र आमच्या गावात येऊन स्थिरावला. लोकं सांगायची की त्याच्या मनावर परिणाम झाला होता. तो थोडा वेडसरसारखा वागायचा, पण गावात कोणालाही त्रास देत नव्हता. कमळाकर मामांची दुनिया वेगळीच होती. नेहमी फेकून दिलेले, मळकट कपडे अंगावर. ते कपडे तो स्वतःच्या हाताने सुई-दोऱ्यानं शिवून घालायचा. डोक्यावर नेहमी गांधी टोपी. त्याच्या गाठोड्यात त्याचं सगळं आयुष्य भरलेलं असायचं—लोखंडाचा पाण्याचा डबा, जेवणासाठी जर्मनची प्लेट, एक परात आणि दोन-चार कपडे. इतकंच त्याचं घर, इतकंच त्याचं आयुष्...

प्रा.भास्कर चंदनशिव- ग्रामीण मनाचा अक्षरमळा

Image
◆●प्रा.भास्कर चंदनशिव- ग्रामीण मनाचा अक्षरमळा●◆ ◆श्रीकृष्ण उबाळे           मराठवाड्याच्या कोरड्या रानात जन्मलेलं एक लेकरू… लहानपणीच्या दुष्काळाच्या छायेत वाढलेलं… आयुष्याच्या सुरुवातीला खेड्यातल्या मळ्यात शेतकऱ्यांचे अश्रू पाहिलेलं… आणि ते अश्रू अक्षरांतून व्यक्त करून संपूर्ण मराठी साहित्यविश्वात घर करणारा लेखक म्हणजे भास्कर तात्याबा चंदनशिव. १२ जानेवारी १९४५ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातल्या हासेगाव या छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. मूळ नाव भास्कर देवराव यादव. पण दत्तक विधानानंतर ते झाले – भास्कर तात्याबा चंदनशिव. गावाकडच्या चुलीवर भाजलेल्या ज्वारीभाकरीसारखं साधं, खडतर आयुष्य त्यांनी जगलं. प्राथमिक शिक्षण गावात, आणि पुढं अंबाजोगाई-औरंगाबाद (संभाजीनगर) या शिक्षण प्रवासात त्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला. पण कितीही शिकले तरी मन त्यांचं रुतलेलं होतं ते मातीत. कारण निजामशाहीच्या काळातील मराठवाड्यातील दुष्काळ त्यांना सतत भेडसावत होता. १९६२ ते १९७२ या दशकभर त्यांनी दुष्काळाचा अभ्यास केला, त्याला जवळून पाहिलं. गावोगावी पोटापाण्यासाठी भट...

आठवणीतले प्रा.भास्कर चंदनशिव

Image
●◆आठवणीतले प्रा. भास्कर चंदनशिव◆● ◆श्रीकृष्ण उबाळे, बीड               २००१ साली मी बीडमधील बलभीम महाविद्यालयाच्या दारात पाऊल टाकलं. अकरावीचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी म्हणून सुरुवात झाली आणि पुढे बारावी पार करून पदवीच्या प्रवासालाही मी तिथेच सुरुवात केली. त्या काळात बॉटनी, झूलॉजी, कम्प्युटर सायन्स हे विषय हाताळताना इंग्रजी आणि मराठी हे अनिवार्य विषय माझ्यासोबत असायचे. पण खरी गोडी, खरं आकर्षण, खरं वेगळेपण मराठी विभागामुळेच निर्माण झालं. मराठी विभागाचे प्रमुख होते प्रा.भास्कर चंदनशिव सर. साधेपणाने राहणारे, नेहमी नेहरू शर्टात दिसणारे, गंभीर आवाजात बोलणारे आणि त्यातही अनोखी ताकद असणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या पहिल्याच व्याख्यानापासून मला जाणवलं की हे केवळ एक शिक्षक नाहीत, तर लेखक, साहित्यिक आणि विचारवंत आहेत. त्यांचे बोलणे म्हणजे एखाद्या कथेला ऐकण्यासारखे, एखाद्या पुस्तकाच्या पानात शिरल्यासारखे. लहानपणापासूनच आम्ही ‘लाल चिखल’ ही त्यांची कथा शाळेतून कित्येक वेळा वाचली होती. आणि आता तोच लेखक आपल्या समोर व्याख्यान देतो आहे, आपल्यालाच श...

सोनम वांगचुक यांच्या सन्मानातून दिसणारे वास्तव

Image
◆●सोनम वांगचुक यांच्या सन्मानातून दिसणारे वास्तव●◆               भारतात ज्ञान, शहाणपण आणि विद्वत्ता यांना प्राचीन काळापासून मोठं स्थान दिलं गेलं आहे. “विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन |     स्व-देशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ||”  हे संस्कृत सुभाषित केवळ वाक्य नसून भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. राजा आपल्या राज्यात पूजनीय असतो, पण विद्वान संपूर्ण जगात पूजनीय ठरतो. आज या उक्तीचं जिवंत उदाहरण म्हणजे लेह-लडाखचे सुपुत्र सोनम वांगचुक. अभियंता असूनही त्यांनी शिक्षण, पर्यावरण, शाश्वत विकास आणि हिमालयाच्या अस्तित्वासाठी आयुष्य समर्पित केलं. ‘आइस स्तुपा’ सारखा क्रांतिकारी शोध असो वा लष्करासाठी सौर-टेंटची संकल्पना – त्यांच्या कार्यात केवळ विज्ञान नव्हे तर समाजाला उपयोगी ठरणारी दूरदृष्टी दिसते.               त्यांच्या योगदानाचा गौरव भारतानेच नव्हे तर जगभराने केला आहे. 1996 पासून राज्यस्तरीय पदक, 2001 साली “मॅन ऑफ द इयर”, 2002 मध्ये अशोका फेलोशिप, 2014 मध्ये युनेस्को आर्किटेक्च...

शेतकरी बापाच्या शेतमळ्यावर मुलींनी फुलवली ‘खाकी’ची बाग

Image
●◆शेतकरी बापाच्या आंबिका◆● शेतकरी बापाच्या शेतमळ्यावर मुलींनी फुलवली ‘खाकी’ची बाग नंदपूर येथील चंद्रसेन उबाळेंच्या चार मुली पोलीस दलात बजावताहेत सेवा बीड : बीड जिल्ह्याचा उल्लेख झाला की समाजमनात अजूनही काही कटू वास्तव दाटून येते – मुलगी नको अशी मानसिकता, गर्भपातात आघाडी, बालविवाहाची परंपरा… पण हाच बीड जिल्हा आज एका शेतकरी बापामुळे आणि त्याच्या चार मुलींमुळे अभिमानाने डोकं उंचावतो आहे. कारण गेवराई तालुक्यातील नंदपूर गावातील चंद्रसेन उबाळे या शेतकरी बापाच्या कष्टाच्या मळ्यावरून उभ्या राहिल्या आहेत चार खाकीधारी मुली. चंद्रसेन आणि संगिता उबाळे या दाम्पत्याने पाच मुलींच्या संगोपनात मुलगा-मुलगी असा कधीच भेदभाव केला नाही. शिक्षण आणि संस्कार या दोन गोष्टींचं बी त्यांनी आपल्या मुलींच्या मनामनात पेरलं. “तुम्ही तुमचं स्वप्न पहा, कष्ट करा, प्रामाणिकपणे समाजात जगा,” या बोधवाक्यानंच उबाळे कुटुंब उभं राहिलं. यातूनच मोठी मुलगी ज्योती उबाळे हिने २०१४ मध्ये बीड जिल्हा पोलीस दलात भरती होऊन सध्या माजलगाव येथे सेवा सुरू आहे. दुसरी मुलगी अश्विनी उबाळे २०२१ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस द...

माझी बीजमाय 'संजीवनी'

Image
●◆माझी बीजमाय 'संजीवनी'◆●         तिचं नाव संजीवनी असलं तरी गावात सगळेजण तिला वहिनी म्हणतात. लहानपणापासून मी पण तिला वहिनीच म्हणायचो. पण लग्न झाल्यानंतर बायकोच्या सांगण्यावरून नकळत “आई” म्हणू लागलो. माझी ही माय – संजूबाई. शालेय शिक्षण तिचं झालेलं नाही. अक्षरं कधी हाताळली नाहीत. पण तिला शेतकीची, कुणबीकीची मात्र नैसर्गिक, अनुभवजन्य सविस्तर माहिती आहे. एखाद्या शेती खात्यातील अधिकाऱ्याला किंवा प्राध्यापकालाही रानपाला, झाडांची, वेलींची, पिकांची, फळांची माहिती नसेल एवढ्या माहितीचा साठा तिच्याकडे उपलब्ध आहे. ही माहिती तिला कामातूनच लहानापासूनच मिळाली. पानाफुलांचा, वेलवेलीचा, भाजीपाला आणि बियांचा संसार हे तिचे खरे विद्यापीठ. दर वर्षी पावसाळ्याच्या आधी आमचं घर बीजांचं गाठोडं बनतं. घरातल्या वाळक्या ओसरीवर, कुठे बांबूच्या टोपलीत, कुठे जुन्या साड्यांच्या गाठीमध्ये – वेगवेगळ्या बीजांचं संकलन ठेवलेलं असतं. वाळलेल्या वालाच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, शेगड्या, वांगं, टमाटर, चुका, शेपू – कितीतरी प्रकार. गावकऱ्यांच्या बायका येऊन “वहिनी, तुमच्याकडं बी मिळेल का?” असं विचारत...

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

Image
व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत            माझ्या बी.एस्सी.च्या वर्गातला एक शांत, मितभाषी मुलगा – अमोल राऊत. वर्गात फारसं बोलणं नाही, न दाखवणारी धडपड, पण मनामध्ये ध्येयाच्या दिशेने सतत चाललेला प्रवास. आज त्याच्या आयुष्याकडे मागे वळून पाहिलं, की खरंच हा पठ्ठ्या किती मोठा धाडसी निर्णय घेऊ शकतो याची जाणीव होते. १९८५ मध्ये त्याच्या वडिलांनी बीड शहरात “अंबिका भेळ” नावाचा एक छोटासा गाडा सुरू केला होता. साधा गाडा, साधी भेळ-पाणीपुरी, पण त्यात मेहनत, चव आणि प्रामाणिकपणा होता. त्या गाड्याने राऊत कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला, पण मोठ्या प्रमाणावर विस्तार होणं तसं शक्य नव्हतं. दरम्यान अमोलच्या शैक्षणिक वाटचालीत त्याला बँकेत कायम नोकरी मिळाली. अनेकांसाठी हे स्वप्नवत होतं – खात्रीशीर पगार, सुरक्षित भविष्य आणि समाजात मान. पण अमोलच्या मनात मात्र वेगळंच दडलेलं होतं. रोजच्या ऑफिसच्या टेबलावर बसताना त्याला जाणवायचं – “ही माझी खरी वाट नाही.” आणि मग एक दिवस त्याने ठरवलं. समाज काय म्हणेल, नातेवाईक काय विचार करतील याचा विचार न करता त्याने बँकेची क...

स्व. माजी खासदार अंकुशराव टोपे साहेब – एक आठवण

Image
स्व. माजी खासदार अंकुशराव टोपे साहेब – एक आठवण           “शिक्षक म्हणून माझ्या कारकिर्दीची सुरुवात २००९ साली झाली. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजाटाकळी येथे माझी पहिली नेमणूक झाली. त्या वेळेस आम्ही सर्व तरुण शिक्षक सामाजिक कामाची उर्मी घेऊन उभे होतो. शिक्षकांची वेगवेगळी संघटना होत्या, पण आम्ही डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद या संघटनेतून काम करण्याचा निश्चय केला. शनिवार-रविवार सुट्टीत, वेळ मिळेल तसा आम्ही शिक्षकांचे प्रश्न, सन्मान सोहळे, अधिवेशने आयोजित करायचो. मी स्वतः फक्त एक साधा सभासद होतो, पण प्रत्येक कार्यक्रमात मनापासून सहभागी होत असे. आमच्यात सोपान पाष्टे सर, शंकर बोबडे सर, शशिकांत कावळे सर, हरी भोसले सर, विनोद आरसूळ सर, लक्ष्मण नेव्हल सर, अरुण राऊत सर यांच्यासह अनेक मंडळी होती. सगळे एकत्र येऊन काम करताना एक वेगळीच ऊर्जा जाणवायची.           तारीख २० डिसेंबर २०१४. त्या वेळेस राजेश भैय्या टोपे आमदार व माजी मंत्री होते. आम्ही तरुण शिक्षकांनी कॅलेंडर तयार करून छापलं होतं. ...

सेवेचेठायी तत्पर हिरोजी इंदुळकर…!"

Image
 ◆●अभियंता दिन विशेष●◆ "सेवेचेठायी तत्पर हिरोजी इंदुळकर…!"      दि.१५ सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. आज २१ वे शतक असून त्याला विज्ञान तंत्रज्ञानाचे युग म्हणतो.  आज ठीक ठिकाणी विविध अभियांत्रिकी महाविद्यालये, आयआयटी, तंत्रज्ञान विद्यापीठे उपलब्ध आहेत. हजारो अभियान सुद्धा उपलब्ध आहेत. शिवरायांच्या काळात अशा पद्धतीच्या शिक्षण किंवा इंजिनिअरिंगची कुठलीही व्यवस्था नव्हती. स्थापत्य कलेची आजच्याप्रमाणे आधुनिक व्यवस्था नव्हती. त्या काळामध्ये बांधकाम विभाग संभाळणारे बेलदार किंवा त्या क्षेत्रातील तज्ञ असायचे. शिवरायांना रायगड ही राजधानी चांगली घडवायची होती. रायगडावर पूर्वी एक अर्धवट अवस्थेतील किल्ला होता. रायगडाचा डोंगर नुसता डोंगर नव्हता. तो स्वराज्याची राजधानी होणार होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात एकच विचार होता-“हा गड असा उभा राहिला पाहिजे की स्वराज्याचे वैभव आणि सामर्थ्य शत्रूलाही थरथरवेल.” हा स्वप्नसाकार करण्याची जबाबदारी महाराजांनी एका साध्या पण विलक्षण कर्तृत्ववान माणसावर सोपवली-हिरोजी इंदुळकर. हिरोजी हे  केवळ एक बांधकाम प्र...