दुष्काळी डोळे
पाण्याअभावी मोसंबी, डाळीम्ब ,इतर फळबाग नष्ट झालेल्या शेतकऱ्याचे मनोगत
सांगणारी 🌏श्रीकृष्ण उबाळे🌏 यांची एक कविता........!!
😦 दुष्काळी डोळे 😦
पाणी नाही म्हणून
जळून गेला बाग
शेळीच पार बनलो
झालो होतो वाघ..||1||
लेकरावाणी जपलं तुला
पाण्यानं घातलं न्हाऊ
उपाशी पोटी झोपलो
तुला खतांनी घातलं खाऊ.||2||
तुझाच ध्यास मला
तुझ्याच साठी झटायचो
तुझ्यात रुपात रोज
विठ्ठल रखुमाईला भेटायचो ||3||
माझं भविष्य होतास
मनात मी नाचलो
आज तुझी अवस्था पाहुन
पारच मी खचलो ||4||
तुझ्या चिपाडलेल्या देहावर
नजर जेंव्हा टाकतो
तरुण मुलगा मारतो ना
त्या बापासारखा वाकतो ||5||
तुझे मरगळलेले बुंधे तोडताना
अवस्था काय सांगू आता
मेलेल्या लेकराची जनु
बापच पेटवतोय चिता ||6||
सारं सारं पाणी बघ
काळजात आलं दाटुन
डोळेही माझे दुष्काळी
तीथलं पाणीही गेलं आटुन ||7||
✍🏻श्रीकृष्ण उबाळे ,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
कविता आवडल्यास जसी आहे तसी नक्की शेयर करा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Comments
Post a Comment