विभूती निर्मिती
वात्रटिका
विभूती निर्मिती
--------------------
विभूती निर्मिती केल्याशिवाय
राजकारण चालत नाही
कोणी तरी देव-देवी शिवाय
भक्तांचे पानही हालत नाही
त्यामुळेच आज देशामध्ये
इतके कुटुंब स्थापित आहेत
जरी ते राजरोसपणे
लोकशाहीचा गळा कापीत आहेत
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment