जातीवंत
वात्रटिका
जातिवंत
माणुसकी जेव्हा मरते
सारेच गप्प असतात
जाती-जातीत असल्यावर
व्यवहार ठप्प असतात
माणुसकी महत्त्वाची नाही
मुख्य ती जात असते
सारं रान पेटवणारी
जळजळीत वात असते
जातीवाद विरोधीच
पक्के जातिवंत असतात
माणुसकी मेल्यावर
म्हणून ते शांत असतात
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment